Pasha Patel agrowon
ॲग्रो विशेष

Pasha Patel : बांबू लागवडीचा पर्याय रोजगार देणार : पाशा पटेल

Bamboo Cultivation Plant : बांबूलागवडीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणार असून, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होण्यास मदत होणार आहे.

Team Agrowon

Bamboo Cultivation : बांबूलागवडीचा पर्याय शेतकऱ्यांना रोजगार मिळवून देणार आहे, असे प्रतिपादन पाशा पटेल यांनी केले आहे. राज्यातील वातावरणीय बदलाच्या संकटाला तोंड देऊन शाश्वत विकास साधण्यासाठी शेतकऱ्यांनी राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबूलागवड करून जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून बांबूचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली “पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स’’ गठित करण्यात आलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोखाड्यात राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या उपस्थितीत बांबूलागवड शेतकरी मेळाव्याचे आयोजन साई मंदिर सभागृहात करण्यात आले होते.

या वेळी पाशा पटेल यांनी बोलताना सांगितले की, बांबूलागवडीच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होणार असून, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी होण्यास मदत होणार आहे. फक्त पर्यावरण संवर्धनासाठी नव्हे तर बांबूचा उपयोग इतर अनेक कामांसाठी केला जातो. जसे की इमारती, फर्निचर, घड्याळ, पेन अशा असंख्य जीवनावश्यक वस्तू तसेच कागद आणि प्रामुख्याने इंधन निर्मितीसाठी शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक म्हणून बांबूलागवडीचा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरणार आहे.

मोखाडा तालुक्यातील नागरिकांना मिळालेले वनपटे हे डोंगराजवळील असल्याने तापमानवाढीमुळे आंबा, काजू, चिकू, पपईची पिके वातावरणातील बदलामुळे संकटात सापडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबूलागवड केली, तर त्यांना नक्कीच रोजगार उपलब्ध होणार आहे. एक हेक्टरवरील लागवड केलेली बांबूची रोपे चार वर्षे जगवली, तर शेतकऱ्याला सात लाख रुपये अनुदान दिले जाणार आहेत, या वेळी बांबूलागवड मेळाव्यासाठी मोखाडा तहसीलदार मयूर चव्हाण, साहाय्यक गटविकास अधिकारी गवळी, सहा. पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले उपस्‍थित होते.

चार वर्षे अनुदान

मागील वर्षापर्यंत जिल्ह्यात १४०० हेक्टरवर बांबूलागवड करण्यात आली आहे. बांबूलागवडीसाठी वनपट्टा, सातबाराधारक शेतकऱ्यांना जवळपास चार वर्षे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. तर रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांनी बोलताना सांगितले की, मोखाडा तालुक्यात केवळ नागली, वरई पिकांचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पावसाळी पिकांचा हंगाम सोडला तर इतर रोजगार मिळत नाहीत. म्हणून बांबूलागवडीतून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात संततधार

Fertilizer Mismanagement : कृषी सेवा केंद्रातील खत साठ्यात तफावत

Heavy Rain Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

AI In Agriculture : सांगली जिल्हा बँक ‘एआय’साठी देणार अनुदान

Agriculture Marketing : शेतीमाल मार्केटिंग साठी ‘कृषी-पणन’ने एकत्र यावे

SCROLL FOR NEXT