BAIF Agrowon
ॲग्रो विशेष

BAIF Rural Innovation: ‘बायफ’ उभारतेय पुण्यात ग्रामीण नावीन्यपूर्ण केंद्र

Agritech Innovation: तळागाळातील शेतकऱ्यांसाठी गेल्या चार दशकांपासून देशभर विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘बायफ’कडून उरळी कांचनमध्ये तब्बल ६० एकर जागेत ‘ग्रामीण नावीन्यपूर्ण केंद्र’ उभारले जात आहे.

Team Agrowon

Pune News: तळागाळातील शेतकऱ्यांसाठी गेल्या चार दशकांपासून देशभर विविध उपक्रम राबविणाऱ्या ‘बायफ’कडून उरळी कांचनमध्ये तब्बल ६० एकर जागेत ‘ग्रामीण नावीन्यपूर्ण केंद्र’ उभारले जात आहे. या केंद्रात देशभरातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान प्रात्यक्षिकांपासून ते प्रशिक्षणांची सुविधा पुरवली जाणार आहे.

महात्मा गांधी यांच्या ग्रामविकास विचारधारेची परंपरा यशस्वीपणे चालविणारी ‘बायफ’ ही देशातील एक आघाडीची अशासकीय सामाजिक संस्था आहे. गांधीजींच्या इच्छेनुसार मणीभाई देसाई यांनी काही शेतकऱ्यांच्या मदतीने १९४६ पासून उरळी कांचनमध्ये आरोग्यावर काम करणारी संस्था उघडली. त्यातून पुढे ‘बायफ’ची निर्मिती झालेल्या या संस्थेला आता ‘बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन’ नावाने देशभर ओळखले जाते. सध्या महाराष्ट्रासह १७ राज्यांमध्ये कृषी व ग्रामविकासाशी निगडीत उपक्रम ही संस्था राबवते आहे.

‘बायफ’च्या सूत्रांनी सांगितले की, देशातील प्रयोगशील शेतकरी, ग्रामविकासातील संस्था, शासकीय अधिकारी तसेच अभ्यासकांना एकाच ठिकाणी बायफच्या सर्व उपक्रमांची माहिती मिळावी याकरिता ‘ग्रामीण नावीन्यपूर्ण केंद्र’ उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यात या प्रकल्पावर आठ कोटींहून अधिक निधी खर्च केला जाईल. त्यात देशातील नामांकित संस्था व कंपन्यांनादेखील सामावून घेतले जाणार आहे.

या केंद्रात गरीब वर्ग, ग्रामीण घटक, वंचित शेतकरी आणि आदिवासींच्या उन्नतीसाठी बायफने शोधलेले तंत्रज्ञान, उपक्रम याची माहिती मिळेल. कृषी व संलग्न उपक्रमांची प्रात्यक्षिके, प्रशिक्षण व उत्पादनाची विक्री अशी बहुउद्देशीय रचना या केंद्राची असेल.

ग्रामीण नावीन्यपूर्ण केंद्रात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कृषी व्यवस्थेची उपयोजित माहिती देण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. पशुधन विकास, दुग्धविकास, फलोत्पादन, नैसर्गिक शेती, जलसंवर्धन, महिला सक्षमीकरण, आधुनिक शेती तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा वापर याविषयी एकाच ठिकाणी प्रात्यक्षिकांसह माहिती देण्याचा प्रयत्न या केंद्रात केला जाईल.

कृषी केंद्रित ग्रामविकासाचे उपक्रम ‘ग्रामीण नावीन्यपूर्ण केंद्रा’त प्रात्यक्षिकांसह दाखविली जातील. केंद्रातील उपक्रम पाहून ते ग्रामीण भागात उभारले जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने प्रोत्साहन मिळावे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. भरत काकडे, अध्यक्ष, बायफ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा दरात सुधारणा; केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरात सुधारणा तर कांद्याची दरपातळी कायम

Mumbai Rain: मुंबईतील पावसाने २६ जुलै २००५ ची आठवण; अनेक भागात जनजिवन विस्कळीत

Khandesh Cotton Crisis : खानदेशात जिनिंग प्रेसिंग कारखान्यांची धडधड बंद

Crop Insurance Crisis: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ; गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ २२ टक्के अर्ज

Solapur Power Loss : सोलापूर मंडलाची वीजहानी सर्वाधिक

SCROLL FOR NEXT