DCM AJit pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Budget Ajit Pawar Live : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी नागपूरला संस्था स्थापन करणार; अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2025 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी २०२५-२६ अर्थसंकल्प विधिमंडळात सोमवारी (ता.१०) सादर केला. यावेळी पुन्हा संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार अजित पवारांनी मानले, तसेच लोकहिताचे निर्णय राबवण्याची ग्वाही दिली आहे. केंद्र सरकारचे आभार मानून विकास कामामुळे पुन्हा आलो, असंही अजित पवार म्हणाले.

Dhananjay Sanap

AJit Pawar Live : अवर्षण भागात उद्योग, वस्त्रोद्योगांला चालना देण्यासाठी नागपूर येथे अर्बन हात कामगारांची संस्था उभारण्यात येणार आहे. त्यातून कापूस उत्पादकांना योग्य दर मिळेल. तसेच कापसाची मूल्य साखळी निर्माण करणाऱ्या उद्योगाची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५-२६ च्या राज्य अर्थसंकल्पात केली आहे. अजित पवारांनी सलग ११ व्यांदा अर्थसंकल्प सादर केला.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी २०२५-२६ अर्थसंकल्प विधिमंडळात सोमवारी (ता.१०) सादर केला. यावेळी पुन्हा संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार अजित पवारांनी मानले, तसेच लोकहिताचे निर्णय राबवण्याची ग्वाही दिली आहे. केंद्र सरकारचे आभार मानून विकास कामामुळे पुन्हा आलो, असंही अजित पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेल्या विविध घोषणांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

राज्यात परदेशी १५ हजार कोटींची गुंतवणूक दावोसमधील परिषदेत झाली. त्यामुळे राज्यात १६ लाख रोजगार निर्माण होईल, असंही पवार म्हणाले. देशातील कृषी क्षेत्रातील निर्यातीत राज्याचा वाटा १५.४ टक्क्यावर पोहचला आहे. एक जिल्हा एक उत्पादन, जिल्हा निर्यात केंद्र निर्माण करण्यात आल्या आहेत. २०४७ मध्ये राज्याची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलीयन अब्ज डॉलरची पोहचवण्याचं उद्दिष्ट आहे. असंही पवार म्हणाले.

शक्तिपीठ महामार्गाची तयारी गतीनं सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले. रत्नागिरी ते नागपूर या शक्तीपीठासाठी ८६ हजार ३०० रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे, असंही पवार म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी विरोध करत आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महामार्ग शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय करण्यात येणार नाही, असं सांगण्यात आलं होतं. परंतु आता मात्र शक्तिपीठ महामार्ग रेटला जात असल्याचा आरोप शेतकरी नेते करत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीकडून शेतकऱ्यांना विविध आश्वासनं दिली आहेत. त्यामूळे या अर्थसंकल्पाकडे शेतकऱ्यांना मोठे अपेक्षा आहेत. शेतकरी कर्जमाफी, सोयाबीन कापूस भावांतर योजनेसह विविध योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT