Yavatmal News : पावसापासून संरक्षणासाठीच्या सोयी सुविधा नसल्याच्या परिणामी मंगळवारी (ता. ९) रात्री झालल्या पावसामुळे उघड्यावरील शेतीमाल भिजत लाखो रुपयांचे नुकसान झाले. आर्णी बाजार समितीत घडलेल्या या प्रकाराविषयी शेतकऱ्यांमधून असंतोष व्यक्त होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मंगळवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच सोसाट्याचा वाराही वाहत होता. याचा फटका भाजीपाला व फळपिकांना बसला. त्यासोबतच आर्णी बाजार समितीत उघड्यावर असलेला शेतीमालही भिजला. या भिजलेल्या शेतमालाची भरपाई आता कोण करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे शेतमाल साठवणुकीसाठी बाजार समितीच्या परिसरात शेडची उभारणी करण्यात आली आहे. परंतु त्यात शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच माल ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचेच अधिक नुकसान झाले. दरम्यान मार्केट यार्डामध्ये पाणी साचल्याने ते काढण्यासाठी सहा मजुरांना लावण्यात आले.
बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल होता. शेतकऱ्यांचा माल मात्र उघड्यावर असल्याने त्याचे पावसाने नुकसान झाले. त्यामुळे बाजार समिती कोणाच्या हितासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.अमोल इंगोले, शेतकरी, आर्णी
शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण देत त्यांचे हित जपणे बाजार समिती प्रशासनाचे आद्य कर्तव्य आहे. परंतु त्यालाच छेद देत बाजार समितीकडून व्यापारी हित जपले जात आहे.अश्विनी यशवंत देशमुख, शेतकरी उमरी, आर्णी, यवतमाळ
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा दहा टक्के तर व्यापाऱ्यांचा ९० टक्के शेतमाल भिजला आहे.विशाल राठोड, सचिव, बाजार समिती आर्णी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.