Ahilyanagar News : कृषी सहायक संघटनेने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करू नाही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा ‘महाडीबीटी’च्या कामासह खरीप हंगामपूर्व अनेक कामावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
मागण्या मान्य झाल्या नाही तर सोमवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि त्यानंतर कृषी आयुक्तालयावर धडक मारण्याचा इशारा कृषी सहायक संघटनेने दिला आहे.
कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करावे, कामकाजासाठी लॅपटॉप उपलब्ध करून द्यावा, कृषी सेवक कालावधी रद्द करावा, विभागाच्या आकृतिबंधामध्ये कृषी सहायकांना योग्य न्याय द्यावा आणि निविष्ठा वाटपातील अन्याय दूर करून सुसूत्रता आणावी यासह इतर मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने केल्या जात असताना त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कृषी सहायक संघटनेने केला आहे.
या मागण्या मान्य होण्यासाठी पाच मेपासून कृषी सहायक संघटनेने टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले. सामूहिक रजा, धरणे आंदोलने, ऑनलाइन कामावर बहिष्कार अशी आंदोलने करून हे सरकार करून दुर्लक्ष झाल्यामुळे पंधरा मे पासून कृषी सहायकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या आंदोलनात ४७० कृषी सहायक सहभागी झाल्याचा दावा कृषी सहायक संघटनेने केला आहे.
सध्या खरीप हंगामा सुरू होण्याचा काळ आहे. याच काळामध्ये कृषी सहायकांनी काम बंद आंदोलन सुरू झाले आहे. खरीप हंगामपूर्व मार्गदर्शन शेतीशाळा, ‘महाडीबीटी’चे विविध कामे, फळबागा व इतर योजनांची अर्ज घेणे, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन, खरीप हंगाम आढावा बैठका, खते, बियाणे उपलब्धता व इतर बाबी यासह विविध कामे खरीप हंगाम पूर्वकाळात सुरू असतात. कृषी सहायकाच्या काम बंद आंदोलनामुळे ही कामे ठप्प होऊ लागली आहेत.
कृषी सहायक कार्यालयात तसेच बांधावर जात नसल्याने कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारीही त्रस्त होऊ लागले आहेत. सोमवारी (ता. १९) कृषी सहायक संघटनेकडून जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतरही मागण्याची दखल घेतली नाही तर कृषी आयुक्त कार्यालयावर धडक मारणार असल्याचा इशारा कृषी सहायक संघटनेने दिला आहे.
कृषी सहायकांच्या प्रलंबित मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार कृषी सहायक संघटनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष जयवंत गदादे, राज्य प्रतिनिधी चंद्रकांत तांदळे, जिल्हा कार्याध्यक्ष धनराज गुंड, जिल्हा कोशाध्यक्ष शरद लांबे, जिल्हा सरचिटणीस आजिनाथ कुंडारे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन खेतमाळस, विनायक तळपाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कृषी सहायकाचे आंदोलन सुरू असले तरी खरीप पूर्व कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही याची कृषी विभाग काळजी घेत आहे. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात असल्याचे ‘कृषी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यात शेती आणि शेतकरी विकासासाठी कृषी सहायक काम करतात. मात्र कृषी सहायकांच्या अनेक मागण्या असून त्याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत आहे. सतत मागण्या करूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे आंदोलन केले जात असून कृषी सहायक यांच्या अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून द्या सोडविण्यात याव्यात.जयवंत गदादे, जिल्हाध्यक्ष, कृषी सहायक संघटना, अहिल्यानगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.