Farmer Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Agitation : बावीस गावांच्या शेतकऱ्यांचे जोड कालव्यासाठी आंदोलन

Demand to Water : गिरणा धरणातून मन्याड धरणात कालव्याद्वारे पाणी आणावे, अशी या भागातील जवळपास २२ खेड्यांमधील शेतकऱ्यांची मागणी आहे.

Team Agrowon

Jalgaon News : गिरणा ते मन्याड जोड कालव्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दशकांपासून २२ खेड्यांतील शेतकरी लोकशाही मार्गाने शासनाकडे मागणी करीत आहेत. मात्र, हाती आश्वासनांशिवाय काहीच लागत नसल्याने बुधवारी (ता. २८) गिरणा धरणापासून कावड यात्रा काढून ‘गिरणा’चे पाणी मन्याड धरणात प्रतीकात्मकरीत्या आणून केलेला निर्धार पूर्ण केला. या अभिनव आंदोलनामुळे गिरणा-मन्याड जोड कालव्याचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

मन्याड धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना धरण असूनही निसर्गाच्या अवकृपेमुळे त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळेच गिरणा धरणातून मन्याड धरणात कालव्याद्वारे पाणी आणावे, अशी या भागातील जवळपास २२ खेड्यांमधील शेतकऱ्यांची मागणी आहे. या संदर्भात वारंवार मागणी करूनही शासनस्तरावर कुठलीही हालचाल होताना दिसत नाही.

त्यामुळे या मागणीकडे शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ही कावड यात्रा काढली. मन्याड परिसरात असलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर तरी हा प्रकल्प लवकरात लवकर साकारला जाईल, अशी भाबडी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु गिरणा-मन्याड जोड प्रकल्पाचा सर्वे अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे ही आशासुद्धा फोलच ठरल्याचे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

कावड यात्रेत विवेक रणदिवे, नवल पाटील, सुभाष पाटील, पुंजाराम पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक पवार, गणेश पवार, शुभम पवार, तात्यासाहेब पाटील, विवेक बोरसे, गोरख पारधी, रवींद्र पाटील, शिवदास पाटील, दत्तू पाटील, बाबूराव पाटील, बाळासाहेब पाटील, निंबा चौधरी, दिलीप पाटील, भानुदास पाटील, तोताराम पाटील, शांताराम पाटील, भाऊसाहेब पाटील, संजय पाटील, योगेश रणदिवे,

योगेश पाटील, देवलाल पाटील, नवल सूर्यवंशी, गणेश रणदिवे, छबिलाल पाटील, प्रशांत रणदिवे, प्रवीण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पवार, भाऊ सूर्यवंशी, दादा सूर्यवंशी, जयवंत सूर्यवंशी, दिलीप पाटील, मोहित पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील, मयूर पाटील, एकनाथ पाटील, बापू पाटील, महेंद्र शिरसाट, विजय पाटील, पद्माकर रणदिवे, श्यामराव सूर्यवंशी, हर्षल पाटील, आयुष रणदिवे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

खाद्यांवरून आणले पाणी

सद्यःस्थितीत समोर भीषण दुष्काळ ‘आ’ वासून उभा असताना व पुढील अंधकारमय भविष्य डोळ्यांसमोर ठेवून लहान मुलांसोबतच ज्येष्ठांनी तरुणांच्या सोबतीने बुधवारी उन्हातान्हाची पर्वा न करता कावड पदयात्रा काढली. गिरणा धरणाच्या जलाशयातून कळशी भरून कावड खांद्यावर घेऊन कळशीतील पाणी प्रतीकात्मकरीत्या मन्याड धरणात आणून टाकले. आंदोलनाची निद्रिस्त शासन व प्रशासनाने दखल घ्यावी, अशी मागणी कावडयात्रेतील शेतकऱ्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर ओसरणार

Sugar Rate : श्रावणातील वाढत्या मागणीमुळे साखरेचे दर वाढण्याची शक्यता

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Agriculture Scheme : कृषी स्वावलंबन, कृषिक्रांती योजनेकडे शेतकऱ्यांचा कल

Fertilizer Stock : युरिया, डीएपी खतांचा साठा शेतकऱ्यांसाठी खुला

SCROLL FOR NEXT