Chankapur Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Chankapur Dam : चणकापूरच्या आवर्तनाचा कसमादेतील गावांना दिलासा

Team Agrowon

Nashik News : यंदा पर्जन्यमान कमी असल्याने कसमादे भागात जानेवारीपासून दुष्काळाच्या झळा जाणू लागल्या होत्या. अशातच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न ऐरणीवर होता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पिण्याच्या पाण्यासाठी चणकापूर धरणातून आवर्तन सुटल्याने कळवण, सटाणा, देवळा व मालेगाव तालुक्यांतील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटणार आहे. शेतकऱ्यांनाही पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी यामुळे दिलासा मिळणार आहे.

तापमानात झालेली वाढ व भूजल पातळी खालावल्याने यंदा पाणीबाणी निर्माण झाली आहे. वाढलेल्या तापमानामुळे बाष्पीभवनाचाही वेग वाढल्याने गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्याचे दिसून आले. तर पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनीही तळ गाठला. धरणांचा व पाणीदार तालुका म्हणून उत्तर महाराष्ट्रात ओळख असलेल्या कळवण तालुक्यालाही यंदा दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत.

त्यामुळे अनेक अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ महिलांवर आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २८ मार्चपासून चणकापूरचे आवर्तन सुटले आहे. येथून १,२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या बिगर सिंचन आवर्तनामुळे अनेक गावांची पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

आवर्तन ८ एप्रिलपर्यंत राहणार सुरू

२८ मार्चपासून चणकापूर धरणातून गिरणा नदीतून ठेंगोड्यापर्यंत हे पाणी आकस्मित आरक्षणाच्या माध्यमातून आले. त्यांनतर पुढे गिरणा डाव्या कालव्यातून पुढे जात आहे. या आवर्तनाच्या माध्यमातून हे पाणी कळवण व सटाणा नगरपालिका, मालेगाव महानगरपालिका या इतर गावांना हे पाणी उपलब्ध होणार आहे. दोन आवर्तनात साधारण ४५ दिवसांचे अंतर ठेवून पाणी सोडले जाते. पुढे ८ एप्रिलपर्यंत साधारणपणे आवर्तन सुरू असणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT