Pune Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Pune Dams: पुणे जिल्ह्यातील धरणांत ८० टक्के पाणीसाठा

Water Storage 2025: मे महिन्यातील पूर्वमोसमी आणि जून, जुलै महिन्यांत झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने जिल्ह्यातील २६ धरणांत १५९.६५ टीएमसी म्हणजेच ८०.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

Team Agrowon

Pune News: मे महिन्यातील पूर्वमोसमी आणि जून, जुलै महिन्यांत झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने जिल्ह्यातील २६ धरणांत १५९.६५ टीएमसी म्हणजेच ८०.४९ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर चार धरणे शंभर टक्के भरली असून तेरा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

३१ मेपर्यंत धरणांत उपयुक्त जवळपास २० टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली होती. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी कडक ऊन पडले आहे. त्यामुळे धरणांतील आवक घटली होती. पुन्हा मागील काही दिवसांपासून घाटमाथा व धरणक्षेत्रात अधूनमधून सरी बरसत आहेत.

आता पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी सोमवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत १.०९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक धरणांत झाली आहे. एक जूनपासून ते आतापर्यंत धरणांत नव्याने २१०.८५ टीएमसी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची काही प्रमाणात समस्या सुटली आहे.

सध्या धरणांत एकूण उपयुक्त पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला आहे. तर अनेक धरणांत ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.गेल्या वर्षी याच काळात धरणांत अवघा ५३.६३ टीएमसी म्हणजेच २७ टक्के पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

मॉन्सून दाखल झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. उजनी, मुठा खोरे, नीरा, कुकडी आणि भीमा खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर अधिक राहिला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातून पाणी वाहिल्याने ओढेही खळाळून वाहू लागले आहेत. धरणांत सुरुवातीला कमी आवक होती. परंतु पावसाचा जोर वाढल्यानंतर धरणांत नव्याने आवक सुरू झाली होती.

उजनीत मोठ्या प्रमाणात आवक

उजनी, नीरा आणि भीमा नदीच्या कार्यक्षेत्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. परिणामी उजनी धरणात सर्वाधिक पाण्याची आवक झाली आहे. आतापर्यंत उजनीत ७९.३६ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

यामुळे उजनीतील पाणीसाठा उणेतून प्लसमध्ये येऊन आता तो ५०.५३ टीएमसी म्हणजेच ९४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या खडकवासला धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे १९ जूनपासून खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यासह इतरही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाण्याचा साठा, टीएमसीमध्ये 

टेमघर २.७४, वरसगाव १०.७५, पानशेत ८.४६, खडकवासला १.०९, पवना ६.५८, कासारसाई ०.५०, कळमोडी १.५१, चासकमान ६.३३, भामा आसखेड ५.२०, आंध्रा २.९२, वडीवळे ०.८३, शेटफळ ०.३३, नाझरे ०.५९, गुंजवणी २.५३, भाटघर २०.४६, नीरा देवघर ८.१३, वीर ८.२४, पिंपळगाव जोगे १.३६, माणिकडोह २.९३, येडगाव १.२२, वडज ०.८०, डिंभे ९.५६, चिल्हेवाडी ०.६२, घोड ४.५४, विसापूर ०.९०, उजनी ५०.५३, मुळशी  १५.५६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : पावसाने ७४४ गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Bhumi Abhilekh Portal : पोर्टलवर ८३ गावांचे दर्शन दुर्लभ

MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर

Fertilizer Buffer Stock : ‘बफर स्टॉक’मधून १३०२ टन युरिया खुला

Health Workers Issue : आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली

SCROLL FOR NEXT