Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bales Production : शेतकरी समूहांनी तयार केल्या कापसाच्या ६५५ गाठी

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : स्मार्ट कॉटन प्रकल्पाच्या माध्यमातून कापसाच्या मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत प्रत्येकी ५०० कापूस गाठी उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले असून, आतापर्यंत शेतकरी समूह, कंपन्यांच्या माध्यमातून ६५५ गाठी उत्पादनाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे.

स्मार्ट कॉटन प्रकल्पाची अंमलबजावणी आत्मा प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने यांच्या मार्गदर्शनात होत आहे. गेल्या वर्षी प्रकल्पात अचलपूर तालुक्‍याचा समावेश करण्यात आला होता. परंतु या तालुक्‍यात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने यंदा अचलपूर ऐवजी धामणगाव रेल्वे तसेच अंजनगावसुर्जी या दोन नव्या तालुक्‍यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

त्यासोबतच दर्यापूर, अमरावती व वरुड हे तीन तालुके गेल्या वर्षीदेखील प्रकल्पात समावेशीत होते. १०० गाठींकरिता सरासरी ५०० क्‍विंटल कापसाची गरज राहते. शेतकरी कंपन्या, समूहांनी त्यांच्या सदस्यांच्या माध्यमातून कापूस संकलित करून पुरवठा करणे अपेक्षित आहे.

प्रक्रियेसाठी प्रकल्पातून जिनिंग व्यावसायिकांची देखील निश्‍चिती करण्यात आली आहे. पाच तालुक्‍यांना प्रत्येकी ५०० गाठी याप्रमाणे २५०० गाठी उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत ६५५ गाठींचे उत्पादन शक्‍य झाल्याची माहिती अर्चना निस्ताने यांनी दिली. गेल्या वर्षी ६०२ गाठींच्या उत्पादकतेचा पल्ला गाठण्यात आला होता. अंजनगावसुर्जी तालुक्‍यातील निमखेड बाजारच्या शेतकऱ्यांनी ५८४.१ क्‍विंटल कापसाचा पुरवठा केला आहे.

त्यापासून १२५ गाठींचे उत्पादन होणार आहे. मात्र जिनिंग व्यावसायिकाच्या उपलब्धतेमुळे हे काम प्रलंबित आहे. टाकळी जहागीर (अमरावती) येथील सात शेतकऱ्यांनी १४५ क्‍विंटल कापसाचा पुरवठा प्रकल्पात केला आहे. दर्यापूर तालुक्‍यात सर्वाधिक २०६८.३ क्‍विंटल कापसाचा पुरवठा ३३ शेतकऱ्यांद्वारे करण्यात आला आहे.

त्यापासून १२५ गाठींचे उत्पादन होणार आहे. मात्र जिनिंग व्यावसायिकाच्या उपलब्धतेमुळे हे काम प्रलंबित आहे. टाकळी जहागीर (अमरावती) येथील सात शेतकऱ्यांनी १४५ क्‍विंटल कापसाचा पुरवठा प्रकल्पात केला आहे. दर्यापूर तालुक्‍यात सर्वाधिक २०६८.३ क्‍विंटल कापसाचा पुरवठा ३३ शेतकऱ्यांद्वारे करण्यात आला आहे.

गायवाडी, समादार, सांगळूद या तीन गावांतील हे शेतकरी असून, त्यांच्या माध्यमातून सुमारे ४४४ गाठींचे उत्पादन झाले आहे. चिंचरगाव (वरुड) येथील १५ शेतकऱ्यांद्वारे ५०९.५४ क्‍विंटल कापसाचा पुरवठा झाला त्यापासून १०८ गाठी तयार आहेत. तळेगाव दशासर (धामणगाव रेल्वे) येथील १५ शेतकऱ्यांच्या माध्यमातून ५०६.१२ क्‍विंटल कापूस पुरवठा करण्यात आला. त्याद्वारे १०३ क्‍विंटल गाठीचे उत्पादन झाले आहे. सध्या दर दबावात असल्याने कापूस गाठींची विक्री करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.

२५०० गाठी उत्पादनाचे उद्दिष्ट असून येत्या काळात १००० गाठींचा टप्पा गाठता येईल. मूल्यवर्धनातून चांगला दर मिळत असल्याचा काही शेतकरी कंपनी, गटांचा अनुभव आहे. त्यामुळेच योजनेला चांगला प्रतिसादही आहे.
अर्चना निस्ताने, प्रकल्प संचालक, आत्मा, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT