Crop Subsidy Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Incentive Subsidy Scheme : प्रोत्साहन अनुदानापासून ३३ हजार शेतकरी वंचित

Loan Waive Scheme : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६ कोटी ७५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबविण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आतापर्यंत १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६ कोटी ७५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र या योजनेतील ३३ हजारांहून अधिक कर्जदारांनी आपले आधार प्रमाणिकरण न केल्याने त्यांना लाभ मिळालेला नसल्याची माहिती सहकार विभागाने दिली आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ आपले आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन सहकारी विभागातर्फे करण्यात आले आहे. संबंधित बॅंकांनीही खातेदारांना या बाबत कळवावे, असे निर्देशही सहकार विभागाने दिले आहेत.

पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना राबविण्यात आली. कोरोना काळात अर्थव्यवस्था कालवल्याने राज्य सरकारने प्रोत्साहन दिले नव्हते. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुती सरकारने प्रोत्साहन अनुदान योजना राबविण्यात सुरुवात केली. या योजनेतील लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने ५२१६ कोटी ७५ लाख रुपये वितरित केले.

या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बॅंकांनी एकूण २९ लाख २ हजार कर्ज खात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर सादर केली. त्यापैकी, ४ लाख ९० हजार कर्जखाती आयकर दाते, पगारदार व्यक्ती आदी कारणांमुळे अपात्र ठरली, तर साधारणत: ८ लाख ४९ हजार कर्जखाती पीक कर्जाची तीन आर्थिक वर्षापैकी केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरली आहेत.

पात्र ठरलेल्या १५ लाख ४४ हजार कर्जखात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी १५ लाख १६ हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. प्रमाणीकरण झालेल्या कर्जखात्यापैकी १४ लाख ४० हजार कर्जखात्यांसाठी ५२२२ कोटी ५ लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली. त्यापैकी १४ लाख ३८ हजार खातेदारांना ५२१६ कोटी ७५ लाख रुपये रकमेचे वितरणही करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे

उर्वरित ३३ हजार ३५६ कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना लाभ मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घेतल्यानंतर त्यांना लाभ देण्यात येईल. संबंधित खातेदारांना बँकांनी त्याबाबत सूचित करावे, असेही निर्देश सहकार विभागाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

Satara DCC Bank : सातारा जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा खेळीमेळीत

Satara ZP Election : सातारा ‘झेडपी’साठी २६ लाख ६६ हजार मतदार

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

SCROLL FOR NEXT