Buldana News : स्थानिक तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने आतापर्यंत लोकसहभागातून सुमारे १७० वनराई बंधारे तयार करण्यात यश आले आहे. तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये यावर्षी जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे आता वनराई बंधाऱ्यात अडणारे पाणी जलस्रोत निर्माण करण्यासाठी मदतगार ठरणार आहे.
सन २०२४-२५ मध्ये जून ते सप्टेंबर काळात जोरदार पाऊस झाल्याने आतापर्यंत अनेक नाल्यातून पाण्याचा प्रवाह सुरू होता. हा पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून त्याचा साठा करण्यात येत आहे. वाहून जाणारे पाणी अडवून पिकांना संरक्षित सिंचन, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधारे तयार करण्याची मोहीम सुरू केली आहे.
खामगाव तालुक्यात डिसेंबर महिन्याच्या अखेर १७० बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले. यावर्षी प्रत्येक कृषी सहायकाला १० वनराई बंधारे श्रमदानातून बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. संपूर्ण जिल्ह्यात यावर्षी लक्ष्यांकानुसार वनराई बंधारे तयार केले जात आहेत.
पावसाळा संपल्यानंतर वाहते पाणी अडवून ते जमिनीत जिरवण्याच्या उद्देशाने वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात येते. त्याचे चांगले फायदे होतात. नागरिक तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवारामध्ये वनराई बंधारे निर्मितीसाठी सहभाग घेऊन सहकार्य करावे.सुनील पवार, तालुका कृषी अधिकारी, खामगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.