Nashik News : काटवन परिसरातील विराणे येथे बोरी नदीवर सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आठ साखळी बंधाऱ्यांची निर्मिती झाली आहे. यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने बहुतांशी बंधारे भरले आहेत. यामुळे जमिनीत पाणीपातळी वाढली आहे. विहिरी, कूपनलिकांच्या पाण्यात वाढ झाली आहे. परिणामी, परिसरात हिरवाई नटणार आहे.
पालकमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून विविध योजनेतून हे शक्य झाले आहे. शहराच्या उत्तरेस पूर्व-पश्चिम काटवन परिसर पसरलेला आहे. परिसरात पूर्वीपासून मोठी नदी, पाट, शेतीसाठी धरणाची व्यवस्था नाही. जे काही बागायत आहे ते शेतकऱ्यांनी स्वतः केले आहे. पूर्वी येथे एकच पिक घेतले जात असे आता दोन ते तीन पिके घेणे शक्य होईल.
पूर्वी बोरी नदीला आलेले शंभर टक्के पाणी वाहून जात असे. म्हणून परिसरात एकच खरीपाचे पिक घेतले जात असे. मोजक्याच शेतकऱ्यांजवळ पाण्याची व्यवस्था होती. परंतु, आता बंधाऱ्यांच्या आजूबाजूला शेतजमीन हिरवाईने नटणार आहे. बंधाऱ्यांचे पाणी जमिनीत मुरून विहिरींची पाण्याची पातळी वाढली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.