Nagpur News: पूर्व विदर्भात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सहभागातून तब्बल १ हजार ४१९ वनराई बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली. हा उपक्रम कृषी विभागाच्या वतीने स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत राबविण्यात आला..नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील नाल्यांवर, ओढ्यांवर व छोट्या प्रवाहांवर ठिकठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात आले. माती, दगड, सिमेंट बॅग, गॅबियन अशा साहित्याचा वापर करण्यात आला आहे..अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी श्रमदान केले, तर काही ठिकाणी ग्रामपंचायती व सीएसआर निधीचा आधार घेण्यात आला. .Vanrai Bandhara : सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ३२० बंधारे बांधून पूर्ण.हा उपक्रम १५ नोव्हेंबरपासून राबविण्यात आला. वर्षाअखेर किमान तीन हजार बंधारे बांधण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे..Water Bunds : खामगावात लोकसहभागातून 170 वनराई बंधारे बांधले .या बंधाऱ्यांमुळे वाहते पाणी अडविण्यात आल्याने जमिनीत मुरण्यास, तसेच रब्बी हंगामात नदी, ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांना ओलिताची सोय होत आहे.विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे..प्रत्येक जिल्ह्यात किमान ५०० वनराई बंधारे बांधण्याचे लक्ष्य देण्यात आले. महिनाभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाने उद्दिष्टाचा निम्मा टप्पा गाठला आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी बंधारे उभारण्याचे नियोजन आहे. पाणी व्यवस्थापन समित्या स्थापन करून देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक पातळीवर देण्यात येणार आहे.- मिलिंद शेंडे, विभागीय अधीक्षक, कृषी विभाग नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.