Cotton and Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

Agriculture Subsidy : राज्य सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : राज्य सरकारने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली. दोन महिने उलटून केले तरी ती अजून प्रत्यक्षात अनुदान जमा न झाल्याने शेतकऱ्यांत नाराजी होती. यातच चार दिवसापूर्वी अनुदानाचे वाटप सुरू झाले असून आतापर्यंत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५१ कोटीचे तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४१ कोटीचे वाटप झाले आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांना अजूनही अनुदान न मिळाल्याने गोंधळ आहे.

गेल्यावर्षीच्या हंगामात कमी उत्पादनामुळे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हेक्टरी अनुदान जाहीर केले आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान असून त्यासाठी ई पीक पाहणीवर पिकांची नोंद झाल्याची अट घालण्यात आली आहे. ती रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी वैजनाथ (जि. बीड) येथे झालेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.

मात्र, त्याचा शेवटपर्यंत शासन निर्णय निघाला नाही. यात अर्थसंकल्पात घोषणा होऊनही दोन महिने झाले तरी अनुदान मिळत नव्हते. अनुदानासाठी तारीख पे तारीख सुरू असताना चार दिवसापासून अनुदान खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी अनुदान जमा झाले नसल्याची तक्रार केली आहे. काही शेतकऱ्यांनी ई - पीक पाहणी केली असतानाही त्यांचे नाव अनुदानाच्या यादीत नसल्याचे पुढे आले आहे.

कृषी विभागाने अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून आधार क्रमांक व संमतिपत्र संकलित केल्यानंतर केवायसीसाठी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख ७१ हजारपैकी ७१ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही. तर लातूर जिल्ह्यातील चार लाख ६५ हजार ६७८ पैकी चार लाख ५६२ शेतकऱ्यांची माहिती पोर्टवलर अद्ययावत केली आहे.

कापूस उत्पादक आठ हजार ८१३ पैकी सात हजार ४२६ शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत केली. एकूण चार लाख ७४ हजार ४९१ पैकी तीन लाख ५५ हजार २४५ शेतकऱ्यांनी ई केवायसी केली. एक लाख १९ हजार २४६ शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नव्हती. उशिराने ई केवायसी केलेल्या व केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात अनुदान मिळणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान ई - पीक पाहणी करूनही अनुदान यादीत नाव नसलेल्या शेतकऱ्यांची नावेही दुसऱ्या यादीत येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्या गावांचा अनुदान यादीत समावेश

औसा तालुक्यातील एकंबी, एकंबी वाडी, एकंबी तांडा, वांगजी, याकतपूर, देवताळा, येळवट व वरवडा या गावांतील शेतकऱ्यांचा सोयाबीन व कापूस अर्थसाह्य योजनेत समावेश नसल्याचे पुढे आले. त्यानंतर कृषी विभागाने वेगवान हालचाली करून या शेतकऱ्यांचा यादीत समावेश केला. येळवट गावचा प्रश्न अजून शिल्लक असल्याचे दिसत आहे. या गावातील केवळ तीनच शेतकरी यादीत दिसत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT