Sindhudurg News : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात नव्याने पुनर्लागवड केलेल्या १५०० हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. १५८ गावांतील ३ हजार ३३२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
जिल्ह्यात रविवारी (ता. ७) मुसळधार पाऊस झाला. सर्व जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये ३ कोटींपेक्षा अधिक मालमत्तांचे नुकसान झाले आहे. परंतु जिल्ह्यात भातपिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील खारेपाटण, चिंचवली, ओरोस, माणगाव, बांदा, वेंगुर्ले, होडावडा, तुळस, आचरा, काळसे बागवाडी, चिंचवली, खांबाळे यासह जिल्ह्यातील १५८ गावांमध्ये नव्याने पुनर्लागवड केलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. काही गावांमध्ये पुराच्या पाण्याखाली भातपीक राहिल्यामुळे भातरोपे कुजली आहेत तर काही ठिकाणी नदी-नाल्यांचे पाणी भातपिकांतून वाहत गेल्यामुळे भातरोपेच वाहून गेली.
गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागाचे कर्मचारी नुकसानीची माहिती घेत आहेत. आतापर्यंत १५८ गावांतील ३३३२ शेतकऱ्यांचे १५०० लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असले तरी ते धीम्यागतीने होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
पुर्नलागवडीबाबत प्रश्न
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या १५०० हेक्टरवर भातरोपांची पुनर्लागवड करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. अनेक शेतकऱ्यांची शेतजमीनच पुर्नलागवडीस पोषक राहिलेली नाही तर दुसरीकडे आता नव्याने रोपवाटिका तयार करून त्याची लागवड करणे शक्य होणार नाही. त्यामुळे ही जमीन आता पडीक राहणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.