Onion Ban Export Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Ban Export : कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना एक हजार कोटींचा फटका

Anil Jadhao 

Pune News : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यानंतर भाव क्विंटलमागे २ हजार रुपयांनी कमी झाले. याचा निर्यातबंदीनंतर बाजार समित्यांमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना जवळपास एक हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

केंद्र सरकारने ७ डिसेंबर रोजी कांद्यावर अचानक निर्यातबंदी लावली. विशेष म्हणजे नेमके याच काळात खरिपातील कांद्याची आवक वाढ जाऊन भावही कमी होत होते. पण सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता निर्यातबंदी केल्याने कांदा बाजार विस्कळीत झाला. याचा सर्वाधिक फटका बसला तो कांदा उत्पादकांना.

कारण कांद्याचे भाव पाहता पाहता निम्म्यावर आले. कांदा निर्यातबंदीच्या आधी बाजारात कांदा सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकला जात होता. मात्र निर्यातबंदीनंतर कांद्याचे भाव सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान आले. म्हणजेच कांद्याचे भाव क्विंटलमागे तब्बल २ हजार रुपयाने पडले.

शेतकरी कांद्याची विक्री बाजार समित्या आणि थेट खळ्यावरूनही करत असतात. निर्यातबंदीनंतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये तब्बल ३६ लाख क्विंटल म्हणजेच ३ लाख ६० हजार टन कांदा बाजारात आला. तर जवळपास दीड लाख टन म्हणजेच १५ लाख क्विंटल कांदा थेट खळ्यांवरून झाली किंवा या कांद्याची नोंद झाली नाही,

असे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले. म्हणजेच ८ डिसेंबर ते २१ डिसेंबर या काळात राज्यातील बाजारात जवळपास ५ लाख टन म्हणजेच ५० लाख क्विंटल कांद्याची विक्री झाली. क्विंटलमागे २ हजार अर्थात टनामागे २० हजारांचा शेतकऱ्यांना भाव पडल्याने फटका बसला. शेतकऱ्यांना १४ दिवसांमध्ये कांद्याचे भाव पडल्याने तब्बल एक हजार कोटींचा फटका बसला.

बाजारातील कांदा आवक
५० लाख क्विंटल
भावातील घट
२ हजार
एकूण फटका
१ हजार कोटी

बाजार समित्यांमध्ये झालेली कांदा आवक (क्विंटलमध्ये)
दिनांक---आवक


८ डिसेंबर---१,७५,२१०
९डिसेंबर---२,०७,५६७
१० डिसेंबर---१,१३,२६०
११ डिसेंबर---२,३६,१९४

१२ डिसेंबर---२,५२,४३५

१३ डिसेंबर---२,९०,६१०

१४ डिसेंबर---२,२८,४१२

१५ डिसेंबर---२,८७,९८७

१६ डिसेंबर---२,४६,१५०

१७ डिसेंबर---८२,६८९

१८ डिसेंबर---४,२७,२२५

१९ डिसेंबर---३,३०,७६२

२० डिसेंबर---३,८०,३४९

२१ डिसेंबर---३,३०,५२२

निर्यातबंदीनंतर कांदा भावात क्विंटलमागे सरासरी २ हजार रुपयांची घट झाली. सरकारने अचानक निर्यातबंदी घालण्याऐवजी आधी पूर्वसूचना देणे आवश्यक होते. पुढील काळात इतर राज्यातीलही कांदा आवक वाढेल.
खंडूकाका देवरे, अध्यक्ष, नाशिक जिल्हा व्यापारी
असोसिएशननिर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. कांद्याचा उत्पादन खर्च वाढलेला असतानाही कमी भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे.  शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर निर्यातबंदी तत्काळ मागे घेणे हाच पर्याय आहे.-
मधूकर मोरे, कांदा उत्पादक, सटाणा, जि. नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT