Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : सरकारला मदत द्यायला भाग पाडू ः दानवे

टीम ॲग्रोवन

शिरूर, जि. पुणे ः अवकाळी पावसाने नुकसान (Heavy Rain Crop Damage) झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना (Shivsena) (उद्धव ठाकरे) तीव्रपणे आवाज उठविणार असून, सरकारला मदत द्यायला भाग पाडू, असा विश्वास विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी येथे व्यक्त केला. या संकटाच्या काळात शिवसैनिकांनी सामान्य जनतेच्या घरापर्यंत आणि शेतकऱ्यांच्या शेतशिवारापर्यंत जाऊन त्यांना दिलासा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यातील पावसाने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी दानवे यांनी शुक्रवारी (ता. २१) शिरूर, हवेली व आंबेगाव मतदारसंघांतील काही गावांचा दौरा केला. या वेळी पक्षाचे संपर्क प्रमुख अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर व ज्ञानेश्वर कटके, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, तालुकाप्रमुख सुधीर फराटे व गणेश जामदार, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शिरूर शहर प्रमुख सुनील जाधव, आणि पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी दानवे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी रात्रंदिवस काम करा, सामान्य माणसासाठी आहोरात्र काम करण्याचा संकल्प करा. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व हमखास यश मिळवून देणारे असून, शिवसैनिकांनी खचू नये तर अधिक त्वेषाने लढावे, असे आवाहन दानवे यांनी केले. ते म्हणाले, की राज्यातील बदलत्या वातावरणात, सामान्यांवर कोसळलेल्या संकटात शिवसैनिकांनी निष्ठेचा लढा सुरू करावा.

पश्चिम महाराष्ट्र हा सुधारलेला असल्याचे चित्र बाहेर आहे; मात्र मला तरी विदर्भ, मराठवाडा आणि इथे फरक जाणवला नाही. पश्चिम महाराष्ट्राचे जे चित्र रंगविले जाते, ते भ्रामक सल्याचे इथे आल्यावर जाणवले. येथे वर्षानूवर्षे प्रस्थापित नेते असताना जनतेचे मुलभूत प्रश्न सुटू शकलेले नाहीत.

याच प्रस्थापित लोकांनी इथल्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी अजूनही हात पुढे केलेला नाही. निवडणूका जिंकण्यापुरता जनतेचा वापर होतो; मात्र आम्हा हाडाच्या शिवसैनिकांना हे मान्य नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हे अपेक्षित नाही. प्रस्थापित घरात बसले असताना सामान्य शिवसैनिकांनी या संकटाच्या स्थितीत सामान्य माणसाच्या घरापर्यंत, शेतकऱ्याच्या शेतशिवारापर्यंत जाऊन त्यांना दिलासा द्यावा.

युवा नेते आदित्य ठाकरे हेदेखील लवकरच पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गावोगावी भेटी देणार आहेत. नुकसानग्रस्त भागाचा त्यांचा दौरा शिरूर भागातही असू शकतो. त्यादृष्टीने शिवसैनिकांनी सज्ज रहावे. होत्याचे नव्हते झाल्याचे चित्र त्यांना दाखविताना बळीराजाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रभावीपणे आवाज उठवावा.
अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, महाराष्ट्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT