Dimbhe dam Agrowon
ताज्या बातम्या

Dimbhe Dam : रब्बीसाठी डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी

८०० क्युसेकने विसर्ग; आंबेगाव, शिरूरला फायदा

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : रब्बी हंगामासाठी डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू) (Dimbhe Dam) जलाशयातून पाणी नुकतेच सोडण्यात आले आहे. डाव्या व उजव्या अशा दोन्ही कालव्यास धरणातून ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे याचा फायदा आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

धरणांतील पाण्याची उपयुक्त पाण्याची क्षमता १२.४९ टीएमसी एवढी आहे. पावसाळ्यात पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे धरणे भरून वाहिली. सध्या धरणांत ११.५९ टीएमसी म्हणजेच सरासरी ९२.७९ टक्के पाणीसाठा आहे. परंतु रब्बी हंगाम सुरू असल्याने आंबेगाव, शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांसाठी धरणांतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून नुकतेच पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाण्याचे वितरण करण्यात येईल.

आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणापासूनचा पूर्व भाग आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, सूर्यफूल, मका, फळबागा घेतल्या आहेत. याशिवाय कांदा, बटाटे, भाजीपाला याचे उत्पादन घेतले जाते. सोडलेल्या पाण्याचा कालावधी निश्‍चित नसल्याने शेतकरी वर्ग संभ्रमात असून मे महिन्यापर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT