Jaljeevan Mission
Jaljeevan Mission Agrowon
ताज्या बातम्या

Jaljeevan Mission : जव्हार तालुक्याची तहान भागणार

Team Agrowon

जव्हार : तालुक्यातील अनेक गावांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई (Water Shortage) निर्माण होते; मात्र या वर्षी शासनाने गाव पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी पाऊल पुढे टाकत जलजीवन मिशन (Jaljeevan Mission Scheme), हर घर पाणी योजनेतून तालुक्यात १०६ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.

प्रत्येक आदिवासी कुटुंबाच्या घरात पाणी पोहचण्यासाठी हर घर पाणी योजनेची कामे सुरू झाली आहेत. यामुळे गावे (Village) होणार पाणी (Water) टंचाईमुक्त आणि योजना यशस्वी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा (Water Supply) अधिकारी, यंत्रणा कामाला लागली आहे.

जलजीवन योजनेतून ७८ गावांना हर घर पाणी योजनेसाठी कार्यादेश कामांना मंजुरी देण्यात आली. यापैकी ४५ गावांतील हर घर पाणी योजनांच्या कामांनादेखील सुरुवात झाली आहे.

मात्र त्यातील ३३ गावांतील योजनांची कामे सुरू झाली नाहीत. उर्वरित गावांच्या पाणी योजनेत वन विभागाचा अडथळा आहे. शासकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेपानंतर या अडचणी दूर होण्यासाठी प्रयत्न सुरू असून यात यश मिळेल असे बोलले जात आहे.

पाण्यासाठीची पायपीट थांबणार

तालुक्यातील भीषण पाणीटंचाई असलेली गावांची नोंद पाणीपुरवठा विभागाकडे आहे. यामध्ये दादरकोपरा, खरंबा, पवारपाडा, रिठीपाडा, सगपाणा माळघर, दापटी, बरवाडपाडा, घिवंडा अशा शेकडो गावांना उन्हाळ्यात दरवर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते.

त्यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो; मात्र जलजीवन, हर घर पाणी योजनेमुळे या वर्षानंतर या ग्रामस्थांना विशेष करून महिला वर्गाला पाण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही.

जलजीवन योजनेतून नळाद्वारे सर्व घरांना पाणी मिळणार असल्यामुळे आदिवासी वस्त्यांची अनेक वर्षांची पाणीटंचाई दूर होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

SCROLL FOR NEXT