यंदा राज्यात माॅन्सूनचा पाऊस दाखल न झाल्याने कोयना धरणातील पाण्याने तळ गाठला. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाईची समस्या जाणून लागली आहे. दरम्यान, राज्य शासनाने मे महिन्याच्या अखेरीस जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेला सुरुवात केली.
देवेंद्र फडणवीस सरकारने २०१७ मध्ये ही योजना लागू केली होती. पहिली दोन-अडीच वर्ष जोमात काम झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात योजना बंद पडली होती. त्यात शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान राबवितानाच आता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना २०२६ पर्यंत राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कोयना धरण कोरडे पडल्याने त्यातील गाळ काढण्याची योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतली आहे. त्यानुसार जलसंधारण विभाग व नाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी कोयना धरणाच्या जलाशयातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार महेश शिंदे, नाम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
सध्या जलसंधारण विभाग आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. धरणातील उपसलेला गाळ नजीकच्या नापीक शेत जमिनीमध्ये टाकला आहे. धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जात आहे.
धरणे, गावोगावी बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने अनेक जलाशये गाळात रुतली आहेत. हा गाळ काढला तर धरणांतील पाण्याच्या साठवण क्षमतेत वाढ होईलच पण काढलेला गाळ शेतात टाकून जमिनीची सुपीकता वाढणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.