Rice Festival Agrowon
ताज्या बातम्या

Rice Festival : इंद्रायणी तांदळाची ५५ रुपये किलो दराने विक्री

शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून मावळमधील मावळ अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीने ग्राहकांसाठी इंद्रायणी तांदूळ प्रति किलो ५५ रुपये उपलब्ध दिला आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून मावळमधील मावळ अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीने ग्राहकांसाठी इंद्रायणी तांदूळ (Indrayani Rice) प्रति किलो ५५ रुपये उपलब्ध दिला आहे. पहिल्याच दिवशी पुण्यातील मार्केट यार्ड येथे तांदूळ महोत्सवाला (Rice Festival) ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून, नऊ टन तांदळाची आतापर्यंत विक्री झाली.

माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मावळ अॅग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीने पुण्यात १२ डिसेंबरपासून इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. पुणे जिल्हा बॅँकेचे चेअरमन डॉ. दिगंबर दुर्गाडे, व्हाइस चेअरमन सुनील चांदेरे, संचालक रमेश थोरात यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन झाले.

या वेळी मावळ अॅग्रो कंपनीचे अध्यक्ष माउली दाभाडे, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, माजी पंचायत समिती सदस्य दीपक हुलावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे, कर्ज अधीक्षक गिरीश जाधव, बँकेचे वरिष्ठ अधिकारी नीरज पवार, गणपत भानुसघरे, दत्तात्रेय आंद्रे, बापूसाहेब ढोरे, दत्तात्रेय वारिंगे, संदीप शेटे, नामदेव कोंडे, भाऊसाहेब दाभणे, संजय ढोरे आदी उपस्थित होते.

मार्केट यार्ड येथे हा महोत्सव शंभर दिवस चालणार आहे. कंपनीने इंद्रायणी मावळचा ‘वैभव’ हा ब्रॅण्ड तयार केला असून, पाच किलो, दहा किलो आणि तीस किलो अशा पॅकिंगमध्ये हा तांदूळ उपलब्ध करून दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT