Sahyadri Farms Grapes Agrowon
ताज्या बातम्या

Sahyadri Farms : सह्याद्री’ द्राक्ष ब्रँड जगभरात पोहोचवून हक्काचा भाव मिळविणार

विलास शिंदे ः निळवंडी येथे कृषी संजीवनी दाता पुरस्कार प्रदान

मुकुंद पिंगळे

नाशिक : गेल्या बारा वर्षांत अथक संघर्षातून ‘सह्याद्री’ (Sahyadri Farms) चा प्रवास सुरू आहे. शाश्वत विकासाची दिशा, गुणवत्तापूर्ण उत्पादनवाढीसह उत्पन्नवाढ, त्यातून शाश्वत नफा मिळण्याचे धोरण आहे. त्यासाठी स्पर्धात्मक द्राक्ष वाण (Grape Variety) उपलब्ध करून दिले जात असल्याने पुढील तीन वर्षांत चित्र बदलायचे आहे. या माध्यमातून देशभरात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात ‘सह्याद्री’ द्राक्ष ब्रँड उभा करायचा आहे. त्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण व्यवस्था निर्माण करून ‘अमूल’प्रमाणे हक्काचा भाव मिळविणार आहे. त्यातून सर्व संलग्न शेतकऱ्यांचे मंगल होवो, असे प्रतिपादन सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी केले.

निळवंडी, ता. दिंडोरी येथील सह्याद्री निळवंडी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या वेळी शेतकरी गुणगौरव सोहळा व शेतकरी आनंद उत्सव सोहळा पार पडला. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सह्याद्री निळवंडी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनी तसेच निळवंडी ग्रामस्थांच्या वतीने ‘कृषी संजीवनी दाता’ या पुरस्काराने विलास शिंदे यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमास विष्णू शिंदे, भीमाबाई शिंदे, बाळासाहेब शिंदे, आरती शिंदे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, ‘सह्याद्री फार्म्स सस्टेनेबल ग्रासरुट्स इनिशिएटिव्ह’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित काळे, द्राक्ष तज्ज्ञ मंगेश भास्कर आदी उपस्थित होते.

विलास शिंदे म्हणाले, की जागतिक स्पर्धेच्या अनुषंगाने सह्याद्रीच्या माध्यमातून मिशन मोडवर काम सुरू आहे. त्याअंतर्गत स्थापन झालेल्या विभागनिहाय शेतकरी उत्पादक कंपन्या उद्दिष्ट साध्य करतील याची खात्री आहे. जोडलेला प्रत्येक शेतकरी जबाबदारीने काम करणार आहे. सह्याद्री एक निमित्त असून शेतकऱ्यांना संघटित करून साधन तयार झाले आहे. आपण शेतकरी कुटुंबात जन्माला आलो. पण शेतकऱ्याला सन्मानाने जगताना आनंद मिळाला पाहिजे, असा दिवस पाहायचा आहे. एकीच्या ताकदीने प्रत्येकाला समृद्धीच्या वाटेवर घेऊन जाऊ, असा विश्वास त्यांनी बोलुन दाखविला.
प्रास्ताविक रामदास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन दिलीप पताडे यांनी केले तर, आभार सोमनाथ पताडे यांनी मानले.

कर्जमुक्त झाल्यानंतर नाचून मोठा आनंदोत्सव करू
ग्रामस्थांनी शेतकरी आनंद उत्सव सोहळा साजरा करत विलास शिंदे यांचे आई-वडिलांसह मोठया जल्लोषात स्वागत केले. या वेळी उत्तर देताना शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी फक्त एक टप्पा पार केला. ज्या वेळी या यंत्रणेची जोडलेला प्रत्येक जण कर्जमुक्त असेल, त्या दिवशी खरा आनंदोत्सव साजरा करायचा आहे. प्रत्येक कुटुंबाचा सात-बारा कोरा असेल. आपली स्वतः जबाबदारी घेऊ शकतो; पण यंत्रणेत जोडलेल्या प्रत्येकाची जबाबदारी घेऊन कार्यरत राहूया. ज्या दिवशी सह्याद्रीशी जोडलेला प्रत्येकजण समाधानी, त्याचा सात-बारा कोरा, कर्जमुक्त असेल त्या दिवशी मी स्वतः या आनंदोत्सवात नाचेन, असे शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT