Maharashtra Rain : महाराष्ट्रात मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान होणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचबरोबर पावसामुळे सर्वाधिक फटका भाजीपाला बाजाराला बसत आहे.
याबाबत मुंबईसारख्या भाजीपाला मार्केटमध्ये किरकोळ खरेदीदारांनी अक्षरश: पाठ फिरवल्याने सुमारे ५५० टन भाजीपाला विक्रीविना पडला असल्याची माहिती समोर आली आहे. तर पावसाने जवळपास ८० ते ९० हजार पालेभाज्या जुड्या फेकून देण्यात आल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्यांनी दिली.
सलग तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने एपीएमसीतील आवक घटली आहे. तसेच भाजीपाला विक्री झाला नस्लयाने तो तसाच पडून असल्याचे चित्र आहे. ४५० गाडीहून अधिक आवक भाजीपाला बाजारात झाली. मात्र गेल्या तीन दिवसांत खरेदीदार ४० टक्क्यांनी घटला. त्यामुळे बाजारात आलेला भाजीपाला तसाच पडून होता.
त्यात गुरुवारी सकाळपासून ग्राहक नसल्याने दोन दिवसांचा माल आणि गुरुवारी झालेली आवक यामुळे ५५० टन भाजीपाला व्यापाऱ्यांच्या गाळ्यांत पडून राहिला. साडेपाच लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची आवक झाली. पावसामुळे पालेभाज्या गाडीतच सडल्याने सुमारे ३५ टक्के म्हणजे ९० हजारांहून अधिका जुड्या फेकून
देण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली. शिवाय पावसामुळे भाज्यांचे दरही २० ते २५ टक्क्यांनी घसरले. मात्र हे दर पुन्हा वाढण्याची शक्यता व्यापारी शंकर पिंगळे यांनी वर्तवली आहे.
टोमॅटोच्या दरावर परिणाम नाही
टोमॅटोच्या दरात घाऊक बाजारात कुठलाच बदल झाला नाही. टोमॅटोचे दर ९० ते १०० रुपये किलो होते. तर किरकोळ बाजारात १४० रुपये किलो होते. पालेभाज्यांच्या जुड्या ८ ते १० रुपये घाउकला तर किरकोळला २० रुपये जुडी होती.
इतर भाजीपाला २५ ते ४० रुपये किलो किरकोळ बाजारात दर होते. पावसामुळे दर घसरले असून ते दर दोन दिवसात पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा वाढतील असे ही व्यापाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी ४५० गाड्यांची आवक झाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.