Residue Free Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Residue Free Agriculture : विषमुक्त शेती हेच हवे लक्ष्य

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर म्हणाले, की तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला भारत काही वर्षांत जगद्गुरू होईल. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असून जगभरात भारतातील तरुण मोठमोठ्या पदांवर आहेत.

टीम ॲग्रोवन

सोलापूर : शेतीतील रासायनिक खतांच्या (Fertilizer) अतिवापरामुळे पंजाबसारख्या राज्यात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे विषमुक्त शेतीचे (Residue Free Agriculture) महत्त्व आपल्या लक्षात येईल, हे चित्र थांबवण्यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करून बदलते हवामान (Climate Change) आणि विषमुक्त शेती हेच लक्ष्य आपल्याला ठेवावे लागेल, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केली.

‘सकाळ’च्या सोलापूर आवृत्तीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘भारत महासत्ता-स्वप्न व वास्तव’ या विषयावर डॉ. भटकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’चे निवासी संपादक अभय दिवाणजी, सरव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे उपस्थित होते. प्रारंभी श्री. दिवाणजी यांनी ‘सकाळ’ची भूमिका विषद करून उपस्थितांचे स्वागत केले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर म्हणाले, की तरुणांची सर्वाधिक संख्या असलेला भारत काही वर्षांत जगद्गुरू होईल. देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची असून जगभरात भारतातील तरुण मोठमोठ्या पदांवर आहेत. तरुणांनी नवतंत्रज्ञान लवकर आत्मसात करून जगाला योग्य दिशा द्यायला हवी.

‘वातावरणातील बदल’यावर विशेष काम करण्याची गरज आहे. जगातील अन्य देशाच्या तुलनेत भारतात मोठी शहरे उभारू लागली आहेत. तेथील लोकांच्या आरोग्यासाठी विषमुक्त अन्न मिळावे म्हणून आता विषमुक्त शेतीसाठी ‘बॅलन्स इन ॲग्रीक्लचर’वर भरीव काम करावे लागणार आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांनी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. भटकर यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन बातमीदार किरण चव्हाण, भीष्माचार्य ढवण यांनी केले. आभार सोलापूरचे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) अभय सुपाते यांनी मानले.

‘सकाळ’चे नवे मॉड्यूल जगासाठी उपयोगी

युक्रेन युद्धातून जगातील असंतुष्टपणा अधोरेखित झाला आहे. अशावेळी ‘जग हे दिसतं तसं नाही’ हा विचार मांडलेल्या एका शास्त्रज्ञास नोबेल पुरस्कार मिळाला. पण, ते सर्व विचार वेदांमध्ये यापूर्वीच मांडलेले आहेत. वेदातील विचार, विज्ञानातून अध्यात्म, याची जगाला सध्या खूप मोठी गरज आहे. त्यासाठी ‘सकाळ’ने सुरू केलेला संतुलित जीवनशैली मॉड्यूल (एलआयबी) खूप उत्तम आहे. भविष्यात त्याचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम पहायला मिळेल, असा विश्वासदेखील पद्मभूषण डॉ. भटकर यांनी या वेळी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT