VNMKV Parbhani Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Research : शेतकऱ्यांच्या समस्यांवर संशोधन गरजेचे

Global Warming And Agriculture : जागतिक तापमान वाढ झाली आहे. पावसाचा पॅटर्न बदलला आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, दुष्काळ, गारपीट, कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

Team Agrowon

Parbhani News : जागतिक तापमान वाढ झाली आहे. पावसाचा पॅटर्न बदलला आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, दुष्काळ, गारपीट, कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलांमुळे शेती व्यवसायापुढे विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. या परिस्थितीत त्या-त्या भागांतील स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांचा अंतर्भाव करुन शाश्वत शेतीसाठी आवश्यक बाबींवर संशोधनावर भर द्यावा लागेल.

अन्न सुरक्षेसोबत पोषणमूल्य सुरक्षा, माती, पाणी आदी नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, सूक्ष्म सिंचन, संरक्षित, काटेकोर शेती या यावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

असा सूर सोमवारी (ता. ७) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व केंद्रिय विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘हवामान बदलांच्या स्थितीत शाश्वत शेती संशोधन’ या विषयावरील विचार मंथन कार्यशाळेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा अध्यक्षस्थानी होते. जुनागढ कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. जे. एस. पनवार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. जितेंद्र कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अखिलेश मिश्रा, डॉ. के. एन. तिवारी, डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. डी. पी. वासकर, डॉ. डी. एन. गोखले, डॉ. डी. बी. देवसरकर, डॉ. उदय खोडके आदीची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. मिश्रा म्हणाले, की शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करणारे संशोधन करावे. त्यासाठी गरज पडल्यास निधी दिला जाईल. डॉ. गोरे म्हणाले, हवामान बदलाच्या स्थितीत निविष्ठांचा इष्टतम वापर, संरक्षित शेती, उत्पादनक्षम ते नफ्याची शेती यादृष्टीने शेती तंत्रज्ञानात सुधारणा कराव्या लागतील.

डॉ. मायंदे म्हणाले, की पावसाचे प्रमाण, अतिवृष्टी, पावसाच्या खंडाचे दिवस वाढले आहेत. तापमानातील वाढीमुळे गहू, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अन्नसुरक्षेसह पोषण मूल्याच्या सुरक्षितता यासह शाश्वत शेतीसाठी सामाजिक, आर्थिक राष्ट्रीय अंगानी संशोधन करावे लागेल. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या गरजावर आधारित तंत्रज्ञान विकसित केलेले तंत्रज्ञान व तूर, सोयाबीन, कपाशी आदींसह विविध पिकांचे एकाहून सरस वाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांना जास्त पाणी लागते. उत्पादनात घट येते. जिरायती क्षेत्रापुढे निर्माण झालेल्या आव्हानांची उकल करण्यासाठी यापुढील संशोधनाचा भर राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2026 : केंद्र सरकारने रब्बीचे हमीभाव केले जाहीर; हरभऱ्याच्या हमीभावात २२५ तर करडईच्या हमीभावात ६०० रुपयांची वाढ

Amravati Farmers: अमरावतीत शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

Nanded Flood Rescue: एसडीआरएफकडून २१ पूरपीडितांचा बचाव 

DA Hike : दिवाळीपूर्वीच सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मोठी भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ, जाणून घ्या किती वाढला पगार?

Cotton Farmers: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार द्यावा 

SCROLL FOR NEXT