Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : खानदेशात वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान सुरूच

Team Agrowon

Jalgaon News जळगाव : राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन (ओपीएस) योजना (Old Pension Scheme) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी कमाल शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे पाऊस, वादळात नुकसान होवूनही पंचनामे (Crop Damage Survey) होत नसल्याची स्थिती आहे.

कर्मचाऱ्यांच्या या संपाचा सोमवारी (ता. २०) सातवा दिवस होता. संपात कृषी विभागाचेही कर्मचारी सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार, असा प्रश्‍न कृषी अधिकाऱ्यांसमोर उभा आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संतापही वाढत आहे.

खानदेशात ४ ते ७ मार्च यानंतर मागील मंगळवारपासून (ता. १४) ते गुरुवारपर्यंत (ता. १६) यादरम्यान वादळी पाऊस झाला. तसेच मागील तीन दिवसदेखील अर्थात १७ ते १९ मार्चदरम्यान पाऊस व वादळ, गारपीट झाली आहे. ४ ते ७ मार्चदरम्यानच्या पावसात जळगाव जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवर, धुळ्यात सात हजार व नंदुरबारात सहा हजार हेक्टरला फटका बसला.

नंतर १४ ते १६ मार्चमधील पाऊस व वादळाने खानदेशात सुमारे एक हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. जळगाव जिल्ह्यात १५ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे ५६२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यात हरभरा, बाजरी, गहू, मका व ज्वारी या पिकांचा समावेश आहे.

जळगाव, भुसावळ, जामनेर, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा या तालुक्यांत एकूण ४६ गावे बाधित झाले असून, ६२६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. केळी, लिंबू पिकांची काही प्रमाणात नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. दोन्ही अहवाल प्राथमिक आहेत. नेमकी माहिती व भरपाई मिळवून देणारे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. कारण महसुली व कृषी विभागाचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

साडेतीन हजार हेक्टरवर नुकसान

खानदेशात शनिवारी (ता. १९) व रविवारी (ता.२०) सर्वत्र कमी व अधिक पाऊस, वादळ झाले. त्यातही तिन्ही जिल्ह्यांत किमान तीन ते साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे. परंतु या बाबतही पंचनामे केव्हा होतील, हा प्रश्न आहे.

सोमवारी (ता. २०) सकाळी ढगाळ व पावसाळी वातावरण होते. काही भागात तुरळक पाऊसही झाला. काढणी, मळणीची कामे ठप्प आहेत. शेतकरी चिंतेत असून, भरपाईची मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT