Paddy Agrowon
ताज्या बातम्या

Paddy farming : इगतपुरीत पावसामुळे भात शेतीच्या कामांना गती

Igatpuri Rain Update : इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

Team Agrowon

Nashik Rain News : पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदाच्या हंगामात पावसाने उशिरा का होईना मात्र जोरदार हजेरी लावली आहे. सुरुवातीला पावसाने खंड दिल्याने भाताची रोपे कोमेजून जाण्याची भीती होती.

मात्र गेल्या सप्ताहात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शिवार पाणीदार झाली आहेत. इगतपुरी तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे.

तालुक्यातील जुलैचे पर्जन्यमान ३६९.४ मिमी इतके आहे. सोमवारी (ता. १०) सकाळी ८ वाजेपर्यंत चालू महिन्यात २९८.३ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. ती टक्केवारी ८०.८ टक्के इतकी आहे.

सर्वत्र पडलेल्या दमदार पावसाने भाताची खाचरे भरली आहेत. त्यामुळे रोपे तयार करून भात शेतीला वेग आला आहे. पूर्व भागात पावसाचा जोर वाढल्याने बळीराजा सुखावला आहे. तर तालुक्यात भात शेतीसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

इगतपुरी तालुक्यात पावसाने दुसऱ्या टप्प्यात चांगलीच मुसंडी मारून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. पावसाच्या जोरदार सरी तर मध्येच धुके दाटत असल्याने आल्हाददायक वातावरणाची अनुभूती येत आहे. या वातावरणाचा अनुभव आणि धुक्यात मिसळून जाण्यासाठी पर्यटक दाखल झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT