Nashik Unseasonal Rain
Nashik Unseasonal Rain Agrowon
ताज्या बातम्या

Nashik Unseasonal Rain : आठ वर्षातील सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यात

Team Agrowon

Nashik Unseasonal Rain : वातारणातील बदल (Climate Change) आणि बदलेलेल निसर्गचक्र यामुळे अवेळी पाऊस पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात अवकाळी (Unseasonal Rain) तसेच गारपिटीचा (Hailstorm) पाऊस पडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

यावर्षी मार्च महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेला अवकाळी पाऊस हा गेल्या आठ वर्षाातील सर्वाधिक असल्याचे हवामान विभागाने (Weather Department) म्हटले आहे. याशिवाय राज्यातही सर्वाधिक पाऊस नाशिक जिल्ह्यात नोंदविण्यात आला आहे.

राज्यात मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी नाशिक जिल्ह्यात ४ ते ८ मार्च आणि १५ ते १९ मार्च असा दोन टप्प्यात अवकाळीचा पाऊस झाला. मार्च वगळता जिल्ह्यात एकदाही अवकाळीच्या सरी बरसल्या नाहीत. दोन टप्प्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतीमालाचे नुकसान झाले.

हवामान शास्त्र विभागाच्या (IMD) माहितीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात ३८.६ मिमी पावासाची नोंद झाली आहे. वेधशाळेतील नोंदी केवळ नाशिक शहरापुरत्या मर्यादित आहेत. तर, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, या कालावधित ग्रामीण भागात सरासरी ३६.६ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

आयएमडीच्या अधिकांऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या २००० नंतरच्या रेकॉर्डनुसार २०१५ मध्ये सर्वाधिक ५०.६ मिमी पाऊस झाला आहे. तर २००९ आणि २०१४ या वर्षात १६.३ मिमी पाऊस झाला.

तर उर्वरित महिन्यात शुन्य ते १२.३ मिमीपेक्षा कमी पाऊस झाला. परंतु, यावर्षी अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात फळबागांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार ७४६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे ३२३ गावांतील जवळपास तीन हजार ९४६ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात 1 हजार 746 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण 323 गावांतील एकूण 3 हजार 946 शेतकरीबाधित झाले असून ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे २.६ कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील निफाड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून एक हजार ३५५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यात झालेल्या अवकाळीमुळे सात हजार ४२४ हेक्टर क्षेत्रावरील बागायतीसह बारमाही पिकांचे नुकसान झाले आहे.

मार्च महिन्यात झालेल्या या अवकाळी पावसाचा ५६० गावांना फटका बसला असून १८ हजार ९९० शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT