Mahad News  Agrowon
ताज्या बातम्या

Heavy Rain Damage : आपत्तिग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर

Latest Agriculture News : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Team Agrowon

Mahad News : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अस्मानी संकटांमुळे खचलेल्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीला सरकार आले असून जिल्ह्यातील ५ हजार ५९४ नुकसानग्रस्तांना ५४ लाखांचा निधी वर्ग झाला आहे.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने अक्षरशः कहर केला होता. महाड ,पोलादपूर,श्रीवर्धन , रोहा नागोठणे, पेण अशा भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून २९ जणांना जीव गमवावा लागला तर ५७ जण बेपत्ता आहेत. सावित्री,अंबा, कुंडलिका, गाढी व उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेकडो गावांना फटका बसला होता.

इर्शाळवाडी मदतीपासून वंचित

इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी म्हणून जाहिर झालेल्या २७ जणांच्या नातेवाईकांसाठी ५ लाख रूपयांची मदत आलेली असतानाही तिचे अद्याप वाटप झालेले नाही. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने राबवलेल्या बचाव व शोध मोहिमेत २७ जणांचे मृतदेह आढळून आले.

तर ५७ जणांचा शोध लागलेला नाही. त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यासाठी काही दिवस लागणार आहेत, त्यानंतरच या सर्व मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचे पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.

४५२ घरांची पुनर्बांधणी

आपत्ती काळामध्ये निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केलेल्या ५ हजार ९६ नागरिकांसाठी २९ लाख २४ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर ४५२ घरांच्या पुनर्बांधणीसाठी चार लाख ९८ हजार रुपये दिले जाणार आहेत. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसाठी १५ लाख ८३ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.

महाड तालुक्यातील नुकसानग्रस्त तसेच मृत व्यक्तींच्या वारसांसाठी आर्थिक मदत आली आहे. त्याचे नियमांप्रमाणे वाटप करण्याचे काम सुरू आहे.
- महेश शितोळे, तहसिलदार, महाड
इर्शाळवाडीत शोध मोहीम थांबविल्यानंतरही ५७ जणांचा शोध लागलेला नाही, हा एक भावनिक विषय आहे. त्याचबरोबर दरडग्रस्त हे अल्पशिक्षित असल्याने दुसऱ्यांना मदत मिळाली, आम्हाला का नाही याबाबत त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मृत म्हणून घोषित होणाऱ्या सर्वांच्याच नातेवाइकांना एकाच वेळी मदतीचे वाटप होणार आहे. त्यामुळे काही विलंब होण्याची शक्यता आहे.
-अयुब तांबोळी, तहसीलदार, खालापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT