FRP of sugarcane agrowon
ताज्या बातम्या

FRP of Sugarcane : मोठी बातमी! केंद्र सरकारकडून उसाची एफआरपी जाहीर, प्रतिक्विंटलसाठीचा दर निश्चित

Government Decision : खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यानंतर मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरात बदल केला आहे.

Team Agrowon

Central Government : खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केल्यानंतर मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दरात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोदी सरकारने पुढील हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने २०२३-२४ हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. उसाची नवीन एफआरपी आता ३१५ रुपये प्रतिक्विंटल झाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, मोदी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उसाच्या एफआरपीमध्ये प्रति क्विंटल १० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

उसावर एफआरपी अर्थात वाजवी आणि योग्य किंमत ठरवून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची हमीभाव रक्कम दिली जाते. यंदाचा उसाचा हंगाम आॅक्टोबर महिन्यापासून सुरू होणार असल्याचे ठाकूर म्हणाले.

उसाची एफआरपी वाढवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा फायदा ५ कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती देण्यात आली.

यासोबतच ऊस कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ५ लाख कर्मचाऱ्यांना आणि संबंधित कामांनाही या निर्णयाचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT