Crop Insurance  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : ‘हजार रुपये भरूनही परतावा नाही, तर एक रुपयात काय देणार?’

Crop Insurance Compensation : नव्या हंगामातील पिके डोलू लागली असताना गेल्या हंगामातील शेतकऱ्यांनाच विमा भरपाई मिळाली नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे.

Team Agrowon

Amravati News : नव्या हंगामातील पिके डोलू लागली असताना गेल्या हंगामातील शेतकऱ्यांनाच विमा भरपाई मिळाली नसल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आले आहे. कंपनीने २९,००० शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, हजार रुपये भरूनही परतावा नाही, तर एक रुपयात काय देणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ८८ महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली होती. त्यासोबतच तीन महिने सततचा पाऊस पडला. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४२ इतकी जाहीर करण्यात आली.

याची दखल घेत जिल्ह्यातील २,१९,१०१ शेतकऱ्यांना सरसकट विमा परतावा मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र प्रशासकीय पातळीवर कृषी विभागाकडून पाठपुरावा न झाल्याने कंपनीने अवघ्या ९९,९४२ शेतकऱ्यांना ९२.२४ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दिली त्यांना व काढणीपश्‍चात ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांनाच परतावा देण्यात आला.

या व्यतिरिक्‍त ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली नाही. त्या शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देणे क्रमप्राप्त असतात त्यांना कंपनीने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप आहे. विमा कंपनीने २३७७ शेतकऱ्यांना ६९७ रुपये म्हणजे १६.१६ लाखाचा परतावा देऊन त्यांची एकप्रकारे थट्टा केली, असाही आरोप आहे.

विशेष म्हणजे सर्वेक्षणा दरम्यान कंपनीने नेमलेल्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतल्याचेही आरोप झाले. जास्त नुकसान आणि त्याआधारे अधिक भरपाई मिळवून देण्याच्या सबबीखाली पैसे उकळल्याचे आरोप झाले होते. मात्र त्याची देखील त्या वेळी प्रशासकीय पातळीवर अपेक्षित दखल घेण्यात आली नाही, असाही आरोप आहे.

सुरुवातीला २४ हजार ४०० शेतकऱ्यांचे प्रस्ताव नाकारण्यात आले होते. त्यानंतर कृषी विभागाकडून या संदर्भाने पाठपुरावा करण्यात आला त्या-त्या वेळी कंपनीकडून परतावा दिला जाईल असे सांगण्यात आले. आता मात्र २९००० प्रस्ताव रिजेक्ट केल्याचे कंपनीने कळविले आहे. या संदर्भात शुक्रवारी (ता. १४) जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्या आधारे आता कंपनीला पत्र दिले जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.
-राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT