E-Crop Survey Agrowon
ताज्या बातम्या

E-Pik Pahani : ई-पीक नोंदणीसाठी मुदतवाढ

E-Crop Survey Project : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Team Agrowon

Palghar News : जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांना लहरी हवामान, ओला अगर कोरडा दुष्काळ, पूर किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आधार म्हणून महसूल विभागाकडून पीक पाहणी हा राबवला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई किंवा अन्य शासकीय लाभाच्या योजना मिळवता येतील. शासन स्तरावर या उपक्रमाला आता १५ ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

तालुक्यात ११,३२५ खातेदार असून त्यापैकी ५४९८ खातेदारांची पीक पाहणी पूर्ण झाली आहे, तर ५८२७ खातेदारांची पीक पाहणी प्रगतिपथावर आहे. इंटरनेट आणि काही ठिकाणी मोबाईलच उपलब्धता होत नसल्याने ही पीक पाहणी करताना अडथळा निर्माण होत आहे, यावर सरकारने मार्ग काढावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनाच्या महसूल विभागाच्या ई-पीक पाहणी मोहीम सुरू असली तरी आदिवासी, गरीब शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल नाहीत. त्यामुळे ई-पीक नोंदीसाठी शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी शेतातील कामे सोडून ई- पीक नोंदी करून देण्याची विनंती स्मार्ट मोबाईलधारकांकडे करावी लागत आहे. त्यात अनेकदा इंटरनेटचा व्यत्यय येत असून विजेचा वारंवार खोळंबा होत आहे, परिणामी पीक पाहणी करताना समस्या येत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत.

नोंदणी आवश्यक

ई-पीक पाहणीद्वारे शेतात जाऊन शेतकऱ्यांना पिकांची माहिती भरावयाची आहे. तसे न केल्यास ७ / १२ कोरा राहील, असे सांगण्यात येते.

ई-पीक नोंदणी नसेल तर जागा पडीक आहे, असे समजले जाते त्यामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहतो. तेव्हा ई-पीक नोंदणी करणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणी

तलाठ्यांकडून गाव नमुन्यात पिकांची नोंद केली जात होती. सरकारने पीक नोंदीसाठी ई-पीक नोंदणी ॲप तयार केले आहे. ७/१२ खाते, उताऱ्यावर पीक नोंदी मोबाईल ॲपच्या माध्यमातून करावी लागत आहे.

गरीब,मजूर शेतकऱ्यांकडे स्मार्ट मोबाईल उपलब्ध नाहीत. बहुतांश शेतकरी अशिक्षित असल्याने मोबाईलचे पुरेसे ज्ञान नाही. ई-पीक ॲप कोठून डाऊनलोड करायचे, त्यात कोणती व पिकांची माहिती कशी भरायची, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांकडे स्मार्ट फोन नाही. बऱ्याच गावात डोंगर दऱ्यात शेती आहे, अशा ठिकाणी जाणे जोखमीचे असते, शिवाय मोबाईल व इंटरनेट व वीज व्यवस्था नाही त्यामुळे पीक नोंदीसाठी शेतकऱ्यांना अडचण येत आहे. सरकारने तलाठ्यांकडून पूर्वीप्रमाणे पीक नोंद करावी आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी.
- चिंतामण सापटा, स्थानिक शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT