Supriya Sule  Agrowon
ताज्या बातम्या

Supriya Sule : बॅंक घोटाळे, आर्थिक फसवणुकीतील सर्वसामान्यांचे पैसे लवकर मिळावेत

Team Agrowon

बारामती, जि. पुणे ः ‘‘बॅंक घोटाळे आणि आर्थिक फसवणुकीच्या व्यवहारातील गुन्हेगारांना अटक करण्यापेक्षा, सर्वसामान्यांचे बुडालेले पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने मालमत्तांचा वेगाने लिलाव करून ते परत करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत,’’ अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

मंगळवारी (ता.२७) माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘याबाबत संसदेत मी भूमिका मांडली आहे. बुडीत बँकांबाबत जेव्हा फसवणुकीचा प्रकार घडतो, तेव्हा संबंधितांना अटक होते, ती व्यक्ती तुरुंगात जाते. मात्र त्याच्या मालमत्तांचा वेगाने लिलाव होत नाही. अनेकदा या मालमत्ता लोक घेत नाही, पर्यायाने ज्यांची फसवणूक झालेली आहे अशा सर्वसामान्यांचे पैसेही मात्र अडकून राहतात.’’

खासदार सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, ‘‘या संदर्भात मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती केली आहे, की बॅंक घोटाळ्यातील अधिकारी, संचालकांना अटक करणे न करणे हा कायद्याचा विषय आहे, मात्र यात पहिले काम त्यांच्या मालमत्ता विकल्या गेल्या पाहिजेत, ते विकून ठेवीदार व गुंतवणूकदारांना पहिल्यांदा पैसे दिले गेले पाहिजेत. ही प्रक्रिया क्लिष्ट व लांबलचक आहे, ती सुटसुटीत केली पाहिजे. ही बाब अर्थमंत्री सीतारामन यांनी मान्य केली असल्याने मी त्यांचे आभार मानते. याबाबत त्या लवकरच काही निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे.’’


आगामी अधिवेशनात केंद्राकडे जप्त केलेल्या मालमत्ता विकून किती निधी आला आहे आणि या मालमत्ता विकून सामान्यांचे पैसे का परत दिले जात नाहीत, या बाबत मी प्रश्‍न उपस्थित करणार आहे.
खासदार सुप्रिया सुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT