Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : राज्यात आतापर्यंत ६२ टक्के पेरण्या

Team Agrowon

Pune News : राज्याच्या १६७ तालुक्यांमध्ये आतापर्यंत चांगला पाऊस झाला असून खरिपाच्या पेरण्या ६२ टक्क्यांपर्यंत पोहोचल्या आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

खरीप हंगामातील यंदा सरासरीइतका म्हणजेच १४२ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या अपेक्षित होत्या. परंतु, सोमवार (ता. १७) अखेर प्रत्यक्षात ८८ लाख ४४ हजार हेक्टरवर म्हणजेच ६२ टक्के पेरा झालेला आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, सद्यःस्थितीत ठाणे, गोंदिया, रायगड, सांगली, भंडारा या पाच जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. कापूस व सोयाबीन या पिकाचा विचार करता या दोन्ही पिकाखालील असणाऱ्या क्षेत्राच्या तुलनेत सरासरी ८३ टक्के पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीच्या कामास वेग येत आहे. यामध्ये प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांच्या पेरण्या तसेच भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

५८ तालुक्यांमध्ये अधिक पाऊस

एक जून ते १७ जुलै या कालावधीत राज्यात सरासरी ३८९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा प्रत्यक्षात २७४ मिलिमीटर म्हणजे ७६ टक्के पाऊस पडलेला आहे. १७ जुलैपर्यंत ५२ तालुक्यांमध्ये २५ ते ५० टक्के, १३६ तालुक्यामध्ये ५० ते ७५ टक्के तर १०९ तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्के पाऊस झालेला आहे. केवळ ५८ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.

बियाण्यांचा पुरवठा पूर्ण

राज्यात खरिपासाठी १९.२१ लाख क्विंटल बियाणे लागते. यंदा २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी १९२१४४५ क्विंटल म्हणजेच १०० टक्के बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामाकरिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.

याशिवाय ४८.३४ लाख टन रासायनिक खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यापैकी २१.३१ लाख टन खतांची विक्री झालेली आहे. त्यामुळे राज्यात खताचा २७.०३ लाख टन साठा अजूनही उपलब्ध आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : तापमानवाढीचा शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका : मुख्यमंत्री शिंदे

Bamboo Farming : पृथ्वी रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त : पाशा पटेल

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Fish Production : पर्ससीन, एलईडी मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात घट

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

SCROLL FOR NEXT