Kharif Season Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Crop : भातकुली तालुक्‍यात ५० हजार हेक्‍टर पिके धोक्‍यात

Kharif Crop In Danger : आता वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याची गरज असताना पुन्हा पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Team Agrowon

Amravati Farmer News : जून महिन्यात हुलकावणी देणाऱ्या पावसामुळे पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. आता वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याची गरज असताना पुन्हा पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

परिणामी, भातकुली तालुक्‍यातील ५० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके संकटात सापडली आहेत. त्यातच महावितरणकडून भारनियमन करण्यात येत असल्याने संरक्षित सिंचनालाही खिळ बसली आहे.

जूनमध्ये पावसाने उघडीप दिली होती. परिणामी, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या कराव्या लागल्या. त्यानंतर जुलैत पाऊस बरसला असला, तरी ऑगस्ट पुन्हा कोरडा गेला.

आता राज्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस कोसळत असताना भातकुली तालुका मात्र पावसापासून वंचित राहिला आहे. परिणामी, शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. पिके जळू लागली आहेत.

विहिरी आणि कूपनलिकांमध्ये जेमतेम पाणी आहे. या पाण्यावर पिके जगविण्याची शेतकऱ्यांनी धडपड चालविली आहे. मात्र गेल्या आठ दिवसांपासून वीज वितरण कंपनीने पाऊस कमी झाल्याचे कारण देत भारनियमन सुरू केले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा हा प्रयत्नही अयशस्वी ठरत आहे. एकीकडे पाऊस नाही, तर दुसरीकडे महावितरणने चालविलेल्या खेळ खंडोब्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. परिणामी, भातकुली तालुक्‍यातील तब्बल ५० हजार हेक्‍टरवरील पिके धोक्‍यात आली

आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT