Crop Damage Compensation  Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage Compensation : २३ गावावर अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ

राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्याला अतिवृष्टी अनुदानापोटी ३९७ कोटी रुपये मिळणार आहेत.

Team Agrowon

Crop Damage वडीगोद्री, जि. जालना : अंबड तालुक्यातील वडीगोद्री महसूल मंडळातील २३ गावे अतिवृष्टीच्या अनुदानातून (Crop Damage Subsidy) वगळण्यात आली आहेत.

पडणाऱ्या पावसाची नोंद ठेवणाऱ्या शासकीय संस्था असलेल्या महावेध, महसूल व कृषी विभागाच्या (Agriculture Department) पर्जन्यमापन आकडेवारींमध्ये तफावत असल्याचा फटाका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

त्यामुळे २३ गावातील शेतकऱ्याचे फळबाग व खरीप पिकांचे नुकसान (Crop Damage) होऊनही जवळपास १९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र अनुदानापासून वंचित राहणार आहे.

राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्याला अतिवृष्टी अनुदानापोटी ३९७ कोटी रुपये मिळणार आहेत. तर अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळ वगळता उर्वरित ६ मंडळाला ११८ कोटी रुपये अनुदान मिळणार आहे.

रोहीलागड, जामखेड, अंबड, धनगरपिप्री, सुखापुरी आणि गोंदी महसूल मंडळात येत्या दोन दिवसात अनुदान जमा होणार आहे. अनुदानापासून वंचित राहणाऱ्या वडीगोद्री मंडळातील गावांमध्ये वडीगोद्री, महाकाळा, अंतरवाली सराटी, नालेवाडी, रेणापूरी, चंदनापुरी दह्याळा, भांबेरी, चुर्मापुरी, आपेगाव,बळेगाव, साष्ठपिंपळगाव, टाका, रामगव्हाण, दोदडगाव दूनगाव, सौन्दलगाव, धाकलगाव,गोरी, डोमलगाव, भगवाननगर, गहिनीनाथनगर आदींचा समावेश आहे. वडीगोद्री मंडळात वार्षिक पर्जन्यमान ६६५ मिलिमीटर आहे.

मात्र या वर्षी पडलेल्या पावसाची नोंद ११३३ मिलिमीटर असून सरासरी पेक्षा ४६८ मिलिमीटर अधिक पाऊस झाला. यामुळे फळबागासह खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊनही या वडीगोद्री मंडळाला अनुदानातून वगळण्यात आले.

महावेधच्या आकडेवारीत वडीगोद्री मंडळात अतिवृष्टीची नोंद नसल्याने अनुदानातून वगळण्याचा निर्णय ऑक्टोबरमध्ये झाला होता. सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून राहिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.

त्यामुळे या मंडळाचा अनुदानात समावेश करा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्री अतुल सावे तसेच विभागीय आयुक्ताना निवेदन दिले होते. तरीही अनुदानातून वगळण्यात आले आहे.

- सुरेश काळे, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना जालना

वडीगोद्री मंडळात पाऊस मोजण्याची यंत्रणा आहे. त्या ठिकाणी पाऊस कमी पडला व वडीगोद्री मंडळात अतिवृष्टी असताना अनुदानापासून वंचित आहे. यासाठी आम्ही २३ गावांतील शेतकरी मिळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून अनुदान मिळवण्यासाठी आंदोलन करणार.

- अनिरुद्ध झिंजूर्डे, शेतकरी, बळेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT