
Amaravati News : मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांतील हजारो मजुरांचे रोजगार हमी योजनेच्या (रोहयो)कामाचे जवळपास ६५ कोटी रुपयांची मजुरी अनेक महिन्यापासून थकीत आहे.
त्यामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे ही मजुरी मिळावी यासाठी आमदार केवळराम काळे व खासदार बळवंत वानखडे सरसावले असून त्यांनी सरकारकडे निधी देण्याची मागणी केली आहे.
खासदार बळवंत वानखडे यांनी रोजगार हमी योजनेच्या प्रधान सचिवांची भेट घेऊन मजुरांचे पैसे त्वरित मजुरांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. तर मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी सुद्धा हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न लावून धरला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही या समस्येबाबत अवगत केले.
होळीपूर्वी मजुरांचे पैसे देण्यास आमदारांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक राहुल सोनोने यांनी दिली. शासन निर्णयाप्रमाणे रोहयोची मजुरी मजुरांना पंधरा दिवसाच्या आत मिळणे अपेक्षित असते.
परंतु शासन निर्णयाला ना जुमानता गरीब मजुरांची मजुरी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे मजुरांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. मजुरी न मिळाल्याने मेळघाट ची अर्थव्यवस्था ढसाळली असून बाजारपेठेतही मरगळ आली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.