
Nashik News: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत ‘बफर स्टॉक’साठी यंदा ३ लाख टन कांदा खरेदी प्रस्तावित आहे. मात्र मे महिना संपत आला तरी खरेदी सुरू झालेली नाही. या अगोदर अनेक गैरव्यवहार समोर आले.
त्यामुळे बाजार समित्यांमध्ये पारदर्शक पद्धतीने खरेदी व्हावी अशी शेतकरी, शेतकरी संघटना व खासदारांची आहे. मात्र याकडे केंद्राचे दुर्लक्ष असून नियोजनात अस्पष्टता आहे. खरेदी कधी?, कशी? होणार याबाबत कुठली घोषणा नाही. पारदर्शकता नसल्याने बाजार समितीमध्ये खरेदीच्या मागणीकडे लक्ष लागले आहे.
मागील वर्षी ५ लाख टन कांदा खरेदीचा लक्ष्यांक होता; मात्र तो पूर्ण झालेला नाही. ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ या दोन्ही संस्थांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी पूर्ण केली. ही खरेदी पूर्णतः शिवार खरेदी पद्धतीने झाल्याने यात कुठलीही पारदर्शकता नव्हती. कांदा पट्ट्यातील खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडला. तरीही सरकार याबाबत विचाराधीन का नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
...या होत्या गंभीर बाबी
शिवार खरेदीमध्ये कुठलीही पारदर्शकता नाही.
खरेदी दस्तावेज, खरेदीबाबत कुठलाही नोंदी पब्लिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाहीत.
अनेक ठिकाणी खोटे सातबारा देऊनही ही कांदा खरेदी कागदोपत्री उरकवल्याचे आरोप.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.