Soybean MSP Procurement : सरकार सोयाबीनचे पेमेंट २ दिवसांत देणार ? उद्यापासून हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नावनोंदणी सुरु होणार

Soybean Update : सरकार राज्यात १३ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करणार आहे. सरकार आता हमीभावाने शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करणार आहे.
Soybean MSP
Soybean MSP Agrowon
Published on
Updated on

Pune News : सरकार राज्यात १३ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदी करणार आहे. सरकार आता हमीभावाने शेतकऱ्यांकडून माल खरेदी केल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करणार आहे. पण शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पेमेंट दोन दिवसांमध्ये मिळावे अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना जर २ दिवसांमध्ये पेमेंट द्यायचे असेल तर राज्य सरकारला आधी पेमेंट करावे लागेल आणि नंतर नाफेडकडून पेमेंट घ्यावे लागेल, हा एक पर्याय राज्य सरकारपुढे आहे. 

काही राज्यांमध्ये सध्या अशी पध्दत सुरु आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारे आधी पेमेंट करतात आणि नंतर नाफेडकडून पैसे घेतात. आतापर्यंत सरकार एजंसीकडे पेमेंट देत होते आणि ही एजंसी शेतकऱ्यांना पेमेंट करत होती. त्यामुळे उशीरही लागत होता. पण आता थेट शेतकऱ्यांना पेमेंट मिळणार आहे. म्हणजेच सोयाबीन खेरदी केल्यानंतर नाफेड शेतकऱ्यांना ८ ते १५ दिवसांमध्ये पेमेंट देईल. 

Soybean MSP
Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

सरकार हमीभावाने सोयाबीनची खरेदी करणार केवळ यामुळे खुल्या बाजारात भाव हमीभावाच्या दरम्यान येणार नाहीत. त्यासाठी सरकारला शेतकऱ्यांना लगेच पेमेंट करावे लागेल. कारण नाफेड माल खेरदी केल्यानंतर शेतकऱ्यांना ८ ते १५ दिवसांमध्ये पेमेंट करते. पण अनेकदा उशीर होतो. काही वेळा अनेक शेतकऱ्यांना पेमेंट येण्याला महिनाही लागतो, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सरकारने शेतीमालाची खरेदी हमीभावाने करत असले तरी शेतकरी खुल्या बाजारात माल विकतात. 

अनेक शेतकऱ्यांची नड असते. त्यासाठी लगेच पैसा लागत असतो. नाफेडचे पैसे यायला उशीर होतो. त्यामुळे हे शेतकरी हमीभावापेक्षा ३०० ते ५०० रुपये कमी भाव असला तरी खुल्या बाजारात माल देतात. कारण पेमेंट लगेच मिळते. त्यामुळे सरासरी हमीभावाने खेरदी सुरु असली तरी विक्रीसाठी आणि पेमेंट येण्यासाठी लागणारा वेळ यामुळे शेतकऱ्यांना नाइलाजाने खुल्या बाजारात कमी भावात माल विकावा लागतो. 

Soybean MSP
Soybean MSP : सोयाबीनला हमीभाव मिळावा : ‘किसान संघा’ची मागणी

इतर काही राज्यांमध्ये नड असलेल्या शेतकऱ्यांना लगेच पेमेंट मिळते. नाफेडचे पेमेंट यायला उशीर लागतो. त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांना आधी पैसे देते नंतर नाफेडकडून राज्य सरकार पैसे घेते. त्यामुळे पैशाची नड असल्याने शेतकऱ्यांवर कमी भावात माल विकण्याची वेळ येत नाही. महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांना लगेच पैसे द्यावे आणि नंतर नाफेडकडून घ्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

सरकारने १३ लाख टन सोयाबीनची हमीभावाने खरेदीची प्रक्रिया उद्यापासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. केंद्राने यंदा सोयाबीनला ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला. तर सध्या बाजारभाव हमीभावापेक्षा कमी आहे. बाजारात सध्या सोयाबीनला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. म्हणजेच सध्या हमीभावापेक्षा सोयाबीन भाव किमान ३०० ते ७०० रुपयांनी कमी आहे.

पण जर सरकारने लगेच पेमेंट दिले नाही तर ज्या शेतकऱ्यांना लगेच पेमेंटची गरज आहे ते शेतकरी नाफेडऐवजी कमी भावात खुल्या बाजारात सोयाबीन विकतील. त्यामुळे एकीकडे सरकारची खरेदी सुर असली तरी दुसरीकडे खुल्या बाजारातही आवक चांगली राहू शकते. पण जर सरकारने शेतकऱ्यांना तताडीने पेमेंट दिले तर खुल्या बाजारातही दर हमीभावाच्या दरम्यान येण्याला मदत होऊ शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com