
Pune News : ‘‘भारताच्या भौगोलिक, सामाजिक व हवामानस्तरीय वैविध्यामुळे जलव्यवस्थापनाच्या अडचणीही अनोख्या आहेत. कोकण किंवा ईशान्य भारतासारख्या अतिवृष्टीच्याभागातील उपाययोजना राजस्थानसारख्या कोरडवाहू भागात लागू शकत नाहीत. त्यामुळे प्रादेशिक गरजेनुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन जल अकादमीचे मुख्य अभियंता आणि प्रमुख डी. एस. चासकर यांनी येथे केले.
केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी (एनडब्लुए), केंद्रीय जल आयोग (सीडब्लुसी), पुणे यांच्या वतीने ‘भारतातील जलसंपदा क्षेत्राचा आढावा’ या विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेस सोमवार (ता.४)पासून प्रारंभ झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. चासकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना श्री. चासकर यांनी जलसंपदेसंदर्भातील मुद्द्यांवर जनजागृती, धोरणनिर्मिती आणि जनतेच्या सहभागासाठी मीडिया, स्वयंसेवी संस्था व नागरी समाज यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.
या प्रशिक्षणामध्ये एनडब्लुए मधील अनुभवी प्रशिक्षक व केंद्रीय जल आयोग तसेच अन्य संस्थांतील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी होत आहेत. जलस्रोतांचे उपलब्धता व वितरण, पाण्याची गुणवत्ता, सिंचन विकास, राज्यघटनेतील पाणीविषयक तरतुदी, भूगर्भजल विकास, पूर व्यवस्थापन अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन होणार आहे.
याशिवाय हिवरे बाजार गावासह सीडब्लुपीआरएस (पुणे), खडकवासला धरण, जलगुणवत्ता प्रयोगशाळा, वरील कृष्णा विभागाची हवामान केंद्रे यांनाही भेटी देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण कार्यशाळेचे समन्वयक म्हणून राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक मिलिंद पानपटील कार्यरत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.