Delhi Farmers Protest : शेतकरी आंदोलकांवर पुन्हा पाणी, अश्रू धुराचा मारा

Hunger Strike Update : शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुरक्षा सैनिकांनी अश्रुधूर आणि पाण्याचा जोरदार मारा केल्यामुळे या संघर्षात १७ जण जखमी झाले.
Delhi Farmers
Delhi Farmers Agrowon
Published on
Updated on

Shambhu Border Punjab : ‘किमान आधारभूत मुल्या’स (एमएसपी) कायद्यात्मक मान्यतेसह इतर मागण्यांकरिता शेतकऱ्यांच्या तिसऱ्या ‘जथ्थ्या’ने शनिवारी (ता.१४) तिसऱ्यांदा शंभू बॉर्डरवर धडक दिली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुरक्षा सैनिकांनी अश्रुधूर आणि पाण्याचा जोरदार मारा केल्यामुळे या संघर्षात १७ जण जखमी झाले.

गेल्या चार वर्षांपासून किमान आधारभूत मूल्यास कायद्यात्मक संरक्षण देण्याची प्रमुख मागणी देशभरातील शेतकरी संघटना करीत आहेत. याकरिता दोन वर्षांपूर्वी दिल्लीत मोठे शेतकरी आंदोलनही झाले. मात्र, केंद्र सरकारने याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याविरोधात पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागात शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत.

Delhi Farmers
Delhi Farmer Protest : आणखी एक ‘जथा’ शनिवारी दिल्लीकडे होणार रवाना

दिल्ली आंदोलनानंतर पंजाबातील खनौरी येथे केंद्र सरकारचा लक्षवेध करण्यासाठी ३०७ दिवसांपासून संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू होते, अखेर केंद्र सरकार दखल घेत नाही, हे लक्षात आल्यानंतर ४ डिसेंबरपासून ‘दिल्ली चलो’चा नारा देण्यात आला. मात्र, पंजाब-हरियानाच्या सीमेवरील शंभू बॉर्डर येथे आंदोलनकर्त्यांना अडविण्यात आले.

Delhi Farmers
Protesting Farmers Delhi March : दिल्लीकडे जाणारा शेतकऱ्यांचा मोर्चा पुन्हा स्थगित; पंढेर म्हणाले, बैठकीनंतर पुढील रणनीती ठरवू

यानंतर शांततेच्या माध्यमातून संयुक्त किसान मोर्चाचे निमंत्रक आणि ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल यांच्या नेतृत्वाखाली खनौरी बॉर्डर येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. यापूर्वी दिल्ली पोचण्याकरिता आत्तापर्यंत येथून दोन प्रयत्न करण्यात आले. शनिवारी तिसऱ्या प्रयत्नात किसान मजदूर मोर्चाचे नेते श्रावण सिंग पंधेर यांच्या नेतृत्वाखाली १०१ शेतकरी आंदोलकांच्या जथ्थ्याने शंभू बॉर्डर येथे पुन्हा धडक दिली. यावेळी पोलिसांनी अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करत आंदोलकांना रोखले. यात १७ आंदोलक जखमी झाले. दरम्यान, आंदोलनस्थळा नजीक असलेल्या अंबाला जिल्ह्यातील इंटरनेट आणि संपर्क सेवा १७ डिसेंबरपर्यंत हरियाना सरकारकडून बंद करण्यात आली आहे.

डल्लेवाल यांचे पंतप्रधानांना पत्र

खनौरी बॉर्डर येथे ज्येष्ठ शेतकरी नेते जगजित सिंग दल्लेवाल यांचे १७ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी श्री. दल्लेवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात, त्यांनी पंतप्रधानांनी आपण दिलेल्या आश्‍वासनांचे पालन करावे. केंद्र सरकारकडे दोन उपाय आहेत, एकतर त्यांनी ‘एमएसपी गॅरंटी’ कायदा बनवावा, अन्यथा माझा बळी घेण्यास तयार रहावे, असा इशारा दिला आहे.

देशभरातील शेतकऱ्यांसह सर्वांनी या आंदोलनास पाठिंबा द्यावा. सरकार कितीही ताकदवर असले, तरी जनतेपेक्षा श्रेष्ठ नसते. आम्ही शांततेच्या मार्गाने मागण्या मांडत आहोत, याकरिताच्या दीर्घ संघर्षाला आम्ही तयार आहोत.
श्रावणसिंग पंधेर, शेतकरी नेते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com