
Delhi News : ‘‘१४ डिसेंबरला आणखी १०१ शेतकऱ्यांचा गट दिल्लीकडे कूच करणार आहे,’’ अशी माहिती शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी मंगळवारी (ता. १०) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हरियाना दौऱ्यावरही त्यांनी या वेळी टीका केली.
पंतप्रधान सोमवारी (ता. ९) हरियानात होते पण ते शेतकऱ्यांबद्दल बोलले नाहीत. मोदी सरकारला आपल्या सत्तेचा अभिमान आहे. त्यांना शेतकऱ्यांशी बोलायचे नाही. त्यांनी शेतीसाठी काही केले असेल तर त्यांनी बोलायला हवे,’’ असे ते म्हणाले.
एमएसपी कायद्यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हरियाना, पंजाब सीमेवर तळ ठोकून बसलेल्या शेतकऱ्यांकडून निदर्शने सुरू आहेत. राज्य आणि केंद्र सरकारकडून पिकांसाठी एमएसपीसह १२ मागण्यांची सनद शेतकरी मागत आहेत. या आंदोलनाचा एक भाग म्हणून यापूर्वी ६ डिसेंबर रोजी १०१ शेतकऱ्यांचा जथा दिल्लीकडे रवाना झाला.
या वेळी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. पंजाब सरकार शेतकऱ्यांचा विरोध दडपण्यासाठी केंद्र सरकारची बाजू घेत असल्याचा आरोप पंढेर यांनी केला होता. त्यानंतर आता १४ डिसेंबरला आणखी १०१ शेतकऱ्यांचा गट दिल्लीकडे कूच करणार आहे, असे पंढेर यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘‘भारतातील आघाडी असो किंवा सत्ताधारी भाजप सरकार, शेतकरी या दोघांवरही खूश नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि तरुणांचे वेगळे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा राग कमी करण्यासाठी, सरकार एमएसपी (किमान आधारभूत किंमत) देण्याचे खोटे आश्वासन देत आहे. परंतु आमचे काम केवळ एमएसपी देण्याचे नाही, तर एमएसपी जाहीर केल्यानंतर तुम्ही पीक खरेदी करू नका. आमची मागणी मंडईतून पिकांची खरेदी करण्याची आहे, असे पंढेर यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.