Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे -एकनाथ शिंदे एकत्र येणार? शिवसेना मंत्र्यांचे सूचक विधान

Raj Thackeray Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला पण ते एकत्र आले नाही यावर शिरसाट म्हणाले की, "दोन शिवसेना झाल्या याचं दु:ख आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayagrowon
Published on
Updated on

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी मागच्या ३ वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फारकत घेत शिवसेनेत मोठी बंडखोरी केली. यानंतर दोन्ही गटात जोरदार राजकीय स्थित्यंतरे पहायला मिळाली. मात्र, कट्टर शिवसैनिकांची दोन्ही गट एकत्र यावेत अशी इच्छा आहे. असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. शिरसाट यांच्या वक्तव्याने आगामी काळात राजकीय भूकंप होतील का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.

शिरसाट माध्यमांसमोर म्हणाले की, "आजही माझ्या यातना होतात. आजही कधी उबाठा गटातील पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतात, त्यांचे आणि आमचे नाते तसेच आहे. परंतु मनात जे अंतर पडलं आहे. तू त्या पक्षात, मी या पक्षात हे आवडत नाही पण त्याला करणार काय..एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे तार जुळले पाहिजे. संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करायचा प्रयत्न करेन". असे शिरसाट यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर टीका करत म्हणाले की, "ज्यांचं तोंड पाहत नव्हता त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात, ती चूक सोडली तर माझ्याकडून १०० चूका झाल्या असतील की नाही, आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही. असे शिरसाट म्हणाले.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics: कुणीच अन् कधीच संपत नसतं

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र करण्याचा प्रयत्न झाला पण ते एकत्र आले नाही यावर शिरसाट म्हणाले की, "दोन शिवसेना झाल्या याचं दु:ख आहे. संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार, आता स्थिती इतकीही लांब नाही जी पुन्हा जोडू शकणार नाही. तसेच प्रयत्न एकाबाजूने करून चालत नाही. एकमेकांना अपमानित करून एकत्र आलं पाहिजे असं वाटत असेल तर ते आजच्या घडीला शक्य नाही. राज ठाकरे आणि त्यांनी एकत्र यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बॅनर्स लावले, उपोषण केले मात्र तरीही झाले नाही. एका कुटुंबातील व्यक्ती ते एकत्र आले नाहीत आम्ही तर फार दूर लोटले गेलोय. हे काही दिवसांचे सोबती आहेत ते जातील असं त्यांना वाटते. परंतु आज काय अवस्था हे पाहतोय. असेही शिरसाट म्हणाले.

"ताकद वाढवायची असेल तर एकत्र यायला हरकत नाही, पण यात पुढाकार कोण घेईल हे माहिती नाही. जर पुढाकार कुणी घेतला, विचारांची एक वाक्यता आली तर त्यात गैर काय राहणार नाही. दरम्यान, दोन पाऊले मागे जाणे हा त्यावर उपाय आहे. आदित्य ठाकरे हे करू शकत नाही. आदित्यला मागचा इतिहास माहिती नाही. संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे होते. जे त्या फळीतले आहेत त्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकते. आजही आम्ही एकमेकांना भेटतो. विचारपूस करतो परंतु मनात भीती असते, कुणी पाहिले, कुणी बोलले तर...हे अंतर वाढत राहिले तर ते कधी जुळणार नाही. आता जोडायची स्थिती नसली तरी इतकंही लांब नाही की ते जोडू शकणार नाहीत." असंही सूचक विधान संजय शिरसाट यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com