Sustainable Development : शाश्‍वत विकासासाठी शेतीशिवाय पर्याय नाही

Vilas Shinde : सध्याच्या घडीला पाण्याची शाश्‍वत व्यवस्था, भांडवल, बाजारभाव व वातावरण बदल ही मूलभूत आव्हाने आहेत. मतांच्या बाजारपेठेत पिकविणाऱ्या व्यक्तीपेक्षा खाणाऱ्या व्यक्तीकडे सरकारचे अधिक लक्ष आहे.
Vilas Shinde
Vilas ShindeAgrowon
Published on
Updated on

Nashik News : सध्याच्या घडीला पाण्याची शाश्‍वत व्यवस्था, भांडवल, बाजारभाव व वातावरण बदल ही मूलभूत आव्हाने आहेत. मतांच्या बाजारपेठेत पिकविणाऱ्या व्यक्तीपेक्षा खाणाऱ्या व्यक्तीकडे सरकारचे अधिक लक्ष आहे.

येणाऱ्या काळात शेतकऱ्याने शेतीकडे उद्योग म्हणून बघावे, दृष्टिकोन बदलून प्रक्रिया उद्योग उभारावे. दूध व उसाप्रमाणे इतर पिकात देखील मूल्यसाखळी तयार करावी, असे प्रतिपादन सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी केले.

‘मविप्र’ संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वार्षिक शेतकरी मेळाव्याप्रसंगी दिंडोरी जनता इंग्लिश स्कूल येथे बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते.

Vilas Shinde
Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीसाठी केव्हीकेमार्फत कृषी हवामान व निसर्ग शेतीचा जागर

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्‍वासराव मोरे, चिटणीस दिलीप दळवी, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, शिवाजी गडाख, प्रवीण नाना जाधव, कृषी अधिकारी विजय पाटील, बाळासाहेब जाधव, सुनील केदार,

दत्तात्रय जाधव, बापू पिंगळे, अनिल देशमुख, बाळासाहेब मुरकुटे, शिवाजी बस्ते, संपत घडवजे, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, मुख्याध्यापक रमेश वडजे, प्राचार्य कृष्णा गायकवाड, उपाध्ये आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, की तरुण वर्गाचा नोकऱ्यांकडे ओढा वाढला आहे. देशात आजमितीला २.५ कोटी व महाराष्ट्रात ९ लाख सरकारी नोकऱ्या अशी परीस्थिती आहे. त्यामुळे शेतीक्षेत्रात नवीन संधी शोधाव्या लागतील. तसेच शाश्‍वत विकास साधण्याकरिता शेतीशिवाय पर्याय नाही.

Vilas Shinde
Sustainable Agriculture : शाश्वत कृषीरथाचे चार अश्व

अध्यक्षीय मनोगतात ॲड. ठाकरे म्हणाले, की येणाऱ्या काळात कंट्रोल फार्मिंग करण्याची गरज असून, नियंत्रित पाणी व पॉलिहाउसचा अवलंब केल्याने शेतीला मदत होईल.

प्रास्ताविक प्रवीण जाधव यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षणाधिकारी डॉ. विलास देशमुख यांनी, तर आभार शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे यांनी मानले.

शेतकऱ्याला स्वावलंबी व्हावे लागेल

पुढील काळात शेतकऱ्याला स्वावलंबी व्हावे लागेल. तसेच शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसाय उभारावे. केंद्र सरकारने उसाप्रमाणे कांदा व द्राक्ष पिकांचे केंद्र सरकारने नियोजन करावे जेणेकरून शेतीमालाला योग्य भाव मिळेल.

शेतकऱ्याच्या मालाच्या भावाची हमी सरकारने घ्यावी. तसेच अत्यावश्यक सेवेच्या यादीतून कांदा काढल्याशिवाय कांद्याचा प्रश्‍न सुटणार नाही, असे बापू पिंगळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com