
Buldana News : केंद्र शासनामार्फत कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येणार आहे.
या योजनेमुळे शेतकऱ्यांना वारंवार प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचा दावा केला जात आहे. सोमवारपासून (ता.१६) या योजनेअंतर्गत विशेष मोहिमेला राज्यभरात सुरुवात करण्यात येणार आहे. या मोहिमेत गावनिहाय शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.
केंद्र शासनाने अॅग्रिस्टॅक योजनेच्या मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या असून अॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलदगतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्यासाठी स्थापन केले जात आहे.
या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात कालबद्ध पद्धतीने करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी व त्यांच्या शेतीची आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री) तयार करण्यात येणार आहे.
याद्वारे उपलब्ध आकडेवारीच्या आधारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणिकरणाची (e-KYC) आवश्यकता राहणार नाही. या योजनेअंतर्गत सोमवारपासून प्रत्येक तालुक्यात मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी गावनिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.