Water Crisis : कुर्ले धरणातील गाळामुळे पाणीकपातीचे संकट

Water Scarcity : शहरातील ४० टक्के भागात पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ले धरणाची पातळी उन्हाळ्यात खालावत असल्‍याने पाण्याच्या कपातीचे संकट ओढावते.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Raigad News : महाडचा विकास झपाट्याने होत असून, पाण्याची गरजही दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील ४० टक्के भागात पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ले धरणाची पातळी उन्हाळ्यात खालावत असल्‍याने पाण्याच्या कपातीचे संकट ओढावते. यावर मात करण्यासाठी कुर्ले धरणाची उंची वाढवण्याची तसेच धरणातील गाळ काढण्याची गरज आहे.

रोजगार हमी योजनेतून गाळ काढण्याचा प्रस्‍ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून, मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाड नगरपालिकेने १९६२ मध्‍ये कुर्ले येथे स्वतःमालकीचे धरण बांधले. यातील पाणी गुरुत्व वाहिनीने शहरात येत असल्याने विजेचीही बचत होते.

शहरातील ४० टक्के भागात धरणातील पाण्याचा पुरवठा होतो. उर्वरित ठिकाणी इतर योजना कार्यान्वित आहेत. १९६२ मध्ये बांधलेल्या धरणावर १९८६ पर्यंतची वाढीव लोकसंख्या गृहीत धरून योजना आखण्यात आली होती, परंतु आता धरणातील पाणी कमी पडू लागले आहे.

सध्या धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ०.५११ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. धरणाची उंची वाढवावी तसेच गाळ काढावा, असा प्रस्ताव पालिकेने तयार केला होता. याबाबत नाशिक येथील दगडी धरण विभागाचे अभियंता धरणाची पाहणीही करून गेले, परंतु त्याला आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे.

Water Crisis
Water Crisis Management : जलसंकट निवारणासाठी सर्वांची एकजूट महत्त्वाची

धरणाची उंची वाढवल्‍यास अथवा गाळ काढल्‍यास ०.६०२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमता होणार आहे. त्यामुळे शहराला पुरेसा पाणीपुरवठा होऊ शकेल. धरणातील गाळ काढणे, गळती रोखणे व उंची वाढवणे अशा उपाययोजनांसाठी धरणाची स्थिरता (stability) किती आहे, याची तपासणी करण्यासाठी पालिकेने पुन्हा दगडी धरण विभागाकडे जानेवारी २०१९ महिन्यात पत्रव्यवहार केलेला होता, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Water Crisis
Water Crisis : वळसंगकर अजूनही तहानलेलेच ; पाणीपुरवठा योजनेच्या अडथळ्यांमुळे समस्या कायम

गाळ काढण्याचा प्रस्ताव सादर

धरणाची उंची वाढवण्याचे काम किचकट असल्याने गाळ काढून पाणीसाठा वाढवण्याकरिता नगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे महाड मतदारसंघाचे आमदार असल्याने हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे.

कुर्ले धरणातील गाळ काढण्यासाठी रोजगार हमी योजनेतून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. प्रस्‍तावाला मंजुरी मिळताच काम सुरू करण्यात येईल. धरणातील गाळ काढण्याचे काम लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्‍नशील आहोत.
- प्रवीण कदम, नगर अभियंता, महाड नगर परिषद

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com