
Pune News : वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे घोडनदी कोरडी पडली असून, आमदाबाद परिसरातील पाच गावांवर पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीसाठी उपसा सिंचन योजना ठप्प झाली आहे. पिके सुकू लागल्याने, डिंबा धरणातून पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आमदाबाद येथे घोडनदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. याच बंधाऱ्यावरून आमदाबादसह डोंगरगण, तामखरवाडी, मलठण, निमगाव भोगी या गावांना शेती व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र, बंधाऱ्याच्या ढापांमधून मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाया गेले आहे. परिणामी मागील महिनाभर बंधारा कोरडा पडला आहे.
नदीत पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पाण्याचे पंप बंद पडले आहेत. त्यामुळे फळबागा, भाजीपाला, चारा पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. लवकरच पाणी सोडले नाही, तर हजारो हेक्टरवरील शेती वाया जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी पाहतायेत पाण्याची चातकाप्रमाणे वाट
पाणीप्रश्नी आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पाणी सोडण्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकही घेतली. त्यात पाणी सोडण्याचा निर्णय झाला. मात्र, आठवडा उलटूनही अद्याप पाणी न आल्यांने शेतकरी पाण्यांची वाट पहात आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.