Crop Damage Compensation : अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अनुदान वितरणास मान्यता; तीन शासन निर्णय प्रसिद्ध

Maharashtra Government GR : राज्य सरकार अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देते. परंतु राज्य सरकारने अनुदान देण्याच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २०२५ चे नुकसानीचे अनुदान २७ मार्च २०२३ देण्यात येणार आहे.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon
Published on
Updated on

Crop Damage In Maharashtra : राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यासाठी बुधवारी (ता.६) तीन शासन निर्णय प्रसिद्ध केले आहेत. जून २०२५ मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागात झालेल्या नुकसानीसाठी ९ जिल्ह्यांसाठी १०० कोटी ७८ लाख २ हजार रुपये तर सप्टेंबर-ऑक्टोबर २०२४ मध्ये छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी ३ जिल्ह्यातील २६८ कोटी ८ लाख ८३ हजार रुपयांच्या वितरणाला मान्यता दिली आहे.

राज्य सरकार अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देते. परंतु राज्य सरकारने अनुदान देण्याच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २०२५ चे नुकसानीचे अनुदान २७ मार्च २०२३ देण्यात येणार आहे.

तर २०२४ मध्ये नुकसान झालेल्या तीन जिल्ह्यांसाठी मात्र १ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांकडून करण्यात आलेल्या मागणी प्रस्तावानुसार मदत वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

अनुदानाची आकडेवारी

राज्याच्या विविध भागात जून महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजी, हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्यांतील बाधित ११ हजार १९ शेतकऱ्यांना १४ कोटी ५४ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वाधिक नांदेड जिल्ह्यातील ७ हजार ४९८ शेतकऱ्यांनां १० कोटी ७६ लाख १९ हजार रुपये, त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार २४७ बाधित शेतकऱ्यांना ३ कोटी ६० लाख ४५ हजार रुपये तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १७१ शेतकऱ्यांना १६ आणि बीड जिल्ह्यातील ११ शेतकऱ्यांसाठी १ लाख ९९ हजार रुपयांच्या वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

Crop Damage Compensation
Well Subsidy : विहिरींचे अनुदान वर्षभरापासून थकित

२०२५ जून अमरावती विभाग

दुसऱ्या शासन निर्णयानुसार अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील २२४० बाधित शेतकऱ्यांना २ कोटी ७५ लाख अकोला जिल्ह्यातील ६ हजार १३६ शेतकऱ्यांना ४ कोटी ५ लाख ९० हजार, यवतमाळमधील १८६ शेतकऱ्यांना २५ लाख ४५ हजार रुपये तर बुलढाणा जिल्ह्यातील ९० हजार ३८३ शेतकऱ्यांना ७४ कोटी ४५ लाख ३ हजार आणि वाशीम जिल्ह्यातील ८ हजार ५२७ शेतकऱ्यांना ४ कोटी ७१ लाख २१ हजार रुपये असे एकूण अमरावती विभागासाठी ८६ कोटी २३ लाख ६८ हजार रुपये वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४

तिसऱ्या शासन निर्णयानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ मध्ये शेती पिकांच्या नुकसानीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव जिल्ह्यातील ७९ हजार ८८० शेतकऱ्यांना २८ ऑक्टोबर २०२४ च्या प्रस्तावानुसार ८६ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपये तर धाराशिव जिल्ह्यातील २० मार्च २०२५ च्या प्रस्तावानुसार २ लाख ४८ हजार ५९ बाधित शेतकऱ्यांना १७४ कोटी ९७ लाख ४ हजार रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.

Crop Damage Compensation
Crop Insurance Crisis: शेतकऱ्यांवर ठपका ठेवत पाच हजार कोटींची बचत

तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ हजार ५८४ बाधित शेतकऱ्यांना ६ कोटी ६५ लाख ४१ हजार रुपये म्हणजेच एकूण तीन प्रस्तावानुसार ३ लाख ३५ हजार ५२३ बाधित शेतकऱ्यांसाठी २६८ कोटी ८ लाख हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक विभागातील १ बाधित शेतकऱ्याला ४ हजार रुपयांच्या वितरणाला मान्यता राज्य सरकारने दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com