
Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतात व लगतच्या भागातील अनेक सिंचन प्रकल्पांतील जलसाठा वाढला आहे. या भागात सिंचन प्रकल्पांतील जलसाठा ६० टक्क्यांवर आहे. जोरदार किंवा संततधार पाऊस सुरू राहिल्यास हे प्रकल्प याच महिन्यात पूर्ण भरतील, अशी स्थिती आहे.
खानदेशात अद्याप अपवाद वगळता कुठलाही मध्यम किंवा मोठा सिंचन प्रकल्प १०० टक्के भरलेला नाही. काही प्रकल्पांत अल्प जलसाठा आहे. त्यात पाचोऱ्याती अग्नावती, हिवरा, पारोळ्यातील बोरी, भोकरबारी, चाळीसगावातील मन्याड या प्रकल्पांचा समावेश आहे.
जामनेरातील तोंडापूर धरणातील जलसाठाही हवा तसा वाढलेला नाही. वाघूर धरणात सुमारे ७२ टक्के जलसाठा आहे. गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकचा गिरणा प्रकल्प किंवा गिरणा धरणात फक्त ३७ टक्के जलसाठा आहे.
गिरणा धरणावर चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव आदी भाग अवलंबून आहे. रब्बीखालील २१ हजार हेक्टर क्षेत्र गिरणा धरणाच्या पाण्याने भिजते.
सातपुड्यालगत स्थिती बरी
सातपुडालगत रावेरातील अभोडा धरणात ६२ टक्के, मंगरूळ प्रकल्पात ६८ टक्के व सुकी प्रकल्पात ८३ टक्के जलसाठा आहे. यावलमधीर मोर धरणातही ६६ टक्के जलसाठा आहे. चोपड्यातील गूळ प्रकल्पात सुमारे ४२ टक्के जलसाठा आहे. तर धुळ्यातील शिरपुरातील अनेर धरणातही ३८ टक्क्यांवर जलसाठा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादामधील सुसरी व अन्य प्रकल्पांतही जलसाठा बरा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.