Dharashiv News : या वर्षी जेवळी परिसराला परतीच्या पावसाने हुलकावणी दिली आहे. आता चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस होत असताना पुन्हा जेवळी परिसराला पावसाने हुलकावणी दिल्याने रब्बीच्या उर्वरित पेरण्या होण्याची आशा आता मावळल्या आहेत.
यंदा जेवळी परिसरात पावसाअभावी अनेक फड पेरणीविना रिकामे राहिले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतकरी भविष्यातील चारा, पाणीटंचाईने चिंतेत झाले आहेत. गेल्या वर्षी अतिवृष्टी व रोगराईने पिके नष्ट झाली. या वर्षी अपुऱ्या पावसाने पिके वाया गेली असून, सततच्या या नापिकीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
या वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाचे दीड महिना उशिरा आगमन झाले होते. तेही अपुरा प्रमाणात पाऊस झाल्याने उगवलेल्या पिकेची योग्य वाढ झाली नाही. पावसाची प्रदीर्घ खंड व अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगामात अनेक फडे पेरणीविना रिकामे राहिली होती. अपेक्षित उत्पन्न न निघाल्याने शेतकऱ्यांचे सर्व आशा आता रब्बी हंगामावर होती.
खरीप हंगामात रिकामा ठेवलेल्या फडात काही प्रमाणात पेरण्या उरकल्या. परंतु खरिपाची पेरणी लांबल्याने पुढे राशी व मशागतीत वेळ गेल्याने जमिनीतील ओलावा कमी होत गेला. तसेच परतीचा पावसाने दगा दिल्याने रब्बी पेरणीला मोठा अडथळा निर्माण झाला. पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी देऊन पेरणी उरकल्या. परंतु पुरेशा ओलाव्या अभावी रब्बी हंगामात अनेक फडे पेरणीविना रिकामे राहिले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.